शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

...अन्यथा चार तास रिक्षा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:53 IST

रिक्षाचालकांनी दिला इशारा; कोंडीमुळे ‘नको रे बाबा कल्याण’ म्हणण्याची वेळ

कल्याण : सद्यस्थितीत शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसागणिक जटील होत चालला आहे. एक ते दीड तास या कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने ‘नको रे बाबा कल्याण’, अशी म्हणण्याची वेळ शहराबाहेरील वाहनचालकांवर आली आहे. या कोंडीचा फटका रिक्षाचालकांनाही मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. याचा परिणाम व्यवसायावर देखील होत आहे. वाहतूककोंडीवर पर्याय काढण्यात यावा अन्यथा बुधवार, २५ जुलैपासून ऐन गर्दीच्या वेळी चार तास रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, कल्याण - डोंबिवलीतील वाहतूक समस्येचे नियोजन आणि प्रवाशांकडून होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने कल्याण आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी मंगळवारी रिक्षासंघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक बोलावली आहे.जुना पत्रीपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या वाहनांना जुन्या पुलावरून वाहतूक बंद केली असली तरी त्यांना रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान नवीन पत्रीपुलावरून जाण्यास मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी होऊनही अवजड वाहनांची वाहतूक दिवसाढवळ्या सुरू असून त्यात त्यांची वाहतूक नवीन पत्रीपुलावरून वळवण्यात येत असल्याने कोंडीत अधिकच वाढ झाली आहे. जुन्या पत्रीपुलावरून कल्याणच्या दिशेने अन्य वाहनांची होणारी वाहतूक आणि अवजड वाहनांची नवीन पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपासकडे जाणाºया वाहतुकीमुळे बायपासच्या चौकातच मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. पत्रीपुलासह, सुभाष चौक - मुरबाड रोड, वालधुनी उड्डाणपूल, बैलबाजार चौक, सहजानंद चौक, रेल्वे स्थानक रोड, दुर्गाडी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागते आहे. दीड तासांपर्यंत कोंडीत अडकून पडत असल्याने वेळेसह इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. दरम्यान, संबंधित रस्ते आणि चौक हे रेल्वे स्थानकाकडे येणारे महत्त्वाचे मार्ग असल्याने रिक्षाचालकांना या सतत होणाºया कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो आहे. कोंडीने त्रस्त रिक्षाचालकांनी तर आता बुधवारपासून चार तास रिक्षा बंद ठेवून कोंडीचा निषेध करण्याचा इशारा वाहतूक शाखा उपायुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना रिक्षा चालक मालक असोसिएशनचे प्रकाश पेणकर, संतोष नवले, विलास वैद्य, जितू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.आरटीओ कार्यालयात उद्या बैठककल्याण शहरातील वाहतूककोंडी त्याचबरोबर कल्याण आरटीओ परिक्षेत्राव्यतिरिक्त पासिंगसाठी बाहेरून येणाºया वाहनांमुळे होणारी कोंडी आणि डोंबिवली शहरातील वाहतूक समस्येचे नियोजन आणि प्रवाशांकडून होणाºया तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी २४ जुलैला सायंकाळी साडेचार वाजता कल्याण आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी रिक्षासंघटनांची बैठक बोलावली आहे.या बैठकीला दोन्ही शहरांमधील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसह वाहतूक शाखेचे सहा. पोलीस आयुक्त दीपक बांदेकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वाहतूककोंडीच्या मुद्द्यासह डोंबिवली पश्चिमेकडील भागात रिक्षाचालकांकडून बेकायदेशीररित्या मनमानीपणे जी भाडेवाढ करण्यात आली, त्याबाबत ससाणे काय कारवाई करतात, याकडेही साºयांचे लक्ष आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाkalyanकल्याण