शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

मॉरिशसमध्ये घुमणार हरिनामाचा गजर, आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 17:44 IST

मॉरिशसमध्ये आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्देमॉरिशसमध्ये घुमणार हरिनामाचा गजरआषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन 6 दिवस वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ठाणे :  सुमारे 70 टक्के मूळ भारतीय लोकसंख्या असलेल्या मॉरिशस या निसर्गाचं लेणं लाभलेल्या देशात गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून भारतातील रुढी-परंपरा-संसेकृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न  केला जात आहे. याचा भाग म्हणून रविवार दि. 7 जुलै ते शुक्रवार दि. 12 जुलै 2019 या दरम्यान मॉरिशसमध्ये आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,  अशी माहिती मॉरिशियस मराठी मंडळी फेडरेशनचे भारतातील समन्वयक दीपक दळवी यांनी दिली आहे. 

      मॉरिशसमधील मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी स्पिकिंग युनियन या संस्था सदर महोत्सवाच्या मुख्य आयोजक असून, कास्कावेल येथील मराठी प्रेमवर्धक मंडळी, वाकवॉ येथील श्री मराठी धार्मिक सभा, मरेदी अल्बर्ट येथील मराठी उपकारी सभा, ग्लेन पार्क येथील मराठी कल्चरल सर्कल भवानी मंदीर, ब्यू बसीन येथील विनायक मंदीर या संस्था सह आयोजक आहेत. मॉरिशस मधील कास्कावेल येथे 122 वर्ष प्राचीन विठ्ठल-रखुमाईचे प्रशस्त मंदीर आहे. प्रती पंढरपूर मानल्या जाणाऱया या मंदिराला पंढरपूर पांडुरंग क्षेत्र मंदिर म्हटले जाते. गेली 122 वर्षे या ठिकाणी सातत्यपूर्ण विविध धार्मिक-सांस्कृतिक उपाम साजरे केले जातात. संपूर्ण मॉरिशस मधील मराठी माणसं मोठ्या श्रध्देने या मंदिरात येऊन आपला भक्तीभाव व्यक्त करतात. याच भावनेतून यावर्षी आषाढी एकादशीचे निमित्त साधून सहा दिवसांच्या आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मॉरिशियस मराठी मंडळी फेडरेशन चे भारतातील समन्वयक दीपक दळवी यांनी दिली आहे. या सहा दिवसांत 108 विठ्ठल भजने, पालखी सोहळा, भव्य कार रॅली, हरिपाठ, आरती, महाप्रसाद आदी भरगच्च कार्पामांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणारा संप्रदाय. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गांव-शहरांमधून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी अशी एक दिंड्या पताका नाचवत सामुदायिक अशी पदयात्रा होय. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांची आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हरिनामाचा गजर करत वारीमध्ये सहभाग घेणारा प्रत्येकजण स्वर्गीय सुखाचा आनंद घेत असतो. हाच आनंदाचा ठेवा अनुभवण्यासाठी आणि महाराष्ट्राची परंपरा जतन करण्यासाठी मॉरिशस मधील मराठी मंडळी त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. म्हणूनच हा आषाढी हरिनाम महोत्सव जसा मॉरिशस मधील मराठी लोकांसाठी श्वास आहे, तसाच महाराष्ट्राच्या लोकांसाठीही अतिशय अभिमानाची-कौतुकाची घटना आहे. 

       आषाढी एकादशीचे औचित्य साधून 6 दिवस वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तेही भारतापासून 6 हजार किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या देशात ही बाब  महाराष्ट्राच्या उज्वल संस्कृतीमध्ये भर घालणारी आहे. मॉरिशसमध्ये जसे 122 वर्षे जुने असे विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे तसेच श्री महादेवाच्या भव्य मूर्तीसह तेरावे ज्योर्तिलिंग असलेले मंदिर, राधा-कृष्ण, साईबाबा अशी अनेक मंदिर आहेत. त्या मंदिरांमधून नित्यनेमाने विधीवत उपाम राबविले जातात, त्या मंदिरांचे पावित्र्य टिकविले जाते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक