शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:31 IST

शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.लोकवाङ्मयगृह व ठाणे मतदाता जागरण अभियानतर्फे शनिवारी शिरीष मेढी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त ‘जागतिक अर्थकारण, पर्यावरण व भारत’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी संजीव चांदोरकर यांच्या ‘अर्थाच्या दाहीदिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन कॉ. एम.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सोनाळकर म्हणाल्या की, पूर्वी विषमतेची चर्चा होत होती, पण आज विषमता वाढूनही त्याची जागतिक पातळीवरही चर्चा होत नाही. सरकार स्वत:ला कल्याणकारी म्हणवत असतानाही, विविध योजनांवर खर्च कमी करत आणले जात आहेत. भांडवलशाहीच्या अतिरेकामुळे विषमता वाढीस लागणार, हे सर्वांना माहीत होते, तरीही त्याचाच पुरस्कार जगभर होतो आहे. या विषमतावादी स्थितीचे दोन जग निर्माण झाले आहेत. यात मानवतावादी विचारही मागे पडत आहेत. मूल्य बदलली जात आहेत. नवीन बेदरकार संस्कृती निर्माण होत आहे.पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे म्हणाले, निसर्गातील कार्बन सायकल सुदृढ राहिली तरच पर्यावरण वाचेल. अन्यथा, पृथ्वीचे अस्तित्व संपुष्टात येईल. वातावरण बदलामुळे आदिवासी समूहांचे कुपोषण वाढले आहे. विकास व पर्यावरण ही दोन चाके आहेत. यात सध्या विकासाचे एकच चाक मोठे करण्याचा कार्यक्र म सुरू आहे. यामुळे हा रथ कोसळणार आहे. शहर विकास करताना गाड्या वाढतात व वनसंपत्ती नष्ट होते; पण यावर कोणी विचार करत नाही. शेती व शेतकरी यांचे आयुष्य पर्यावरण नाशामुळे संकटात आले आहे.सध्या जगभर विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. ती आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे काय बदल घडतात, याचा अभ्यास कोण करतेय का? यात मूल्येही बदलत आहेत, हेही लक्षात घ्यावे, असे डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले. या वेळी मेढी व चांदोरकर यांनीही मते व्यक्त केली.

टॅग्स :Politicsराजकारण