शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:31 IST

शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.लोकवाङ्मयगृह व ठाणे मतदाता जागरण अभियानतर्फे शनिवारी शिरीष मेढी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त ‘जागतिक अर्थकारण, पर्यावरण व भारत’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी संजीव चांदोरकर यांच्या ‘अर्थाच्या दाहीदिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन कॉ. एम.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सोनाळकर म्हणाल्या की, पूर्वी विषमतेची चर्चा होत होती, पण आज विषमता वाढूनही त्याची जागतिक पातळीवरही चर्चा होत नाही. सरकार स्वत:ला कल्याणकारी म्हणवत असतानाही, विविध योजनांवर खर्च कमी करत आणले जात आहेत. भांडवलशाहीच्या अतिरेकामुळे विषमता वाढीस लागणार, हे सर्वांना माहीत होते, तरीही त्याचाच पुरस्कार जगभर होतो आहे. या विषमतावादी स्थितीचे दोन जग निर्माण झाले आहेत. यात मानवतावादी विचारही मागे पडत आहेत. मूल्य बदलली जात आहेत. नवीन बेदरकार संस्कृती निर्माण होत आहे.पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे म्हणाले, निसर्गातील कार्बन सायकल सुदृढ राहिली तरच पर्यावरण वाचेल. अन्यथा, पृथ्वीचे अस्तित्व संपुष्टात येईल. वातावरण बदलामुळे आदिवासी समूहांचे कुपोषण वाढले आहे. विकास व पर्यावरण ही दोन चाके आहेत. यात सध्या विकासाचे एकच चाक मोठे करण्याचा कार्यक्र म सुरू आहे. यामुळे हा रथ कोसळणार आहे. शहर विकास करताना गाड्या वाढतात व वनसंपत्ती नष्ट होते; पण यावर कोणी विचार करत नाही. शेती व शेतकरी यांचे आयुष्य पर्यावरण नाशामुळे संकटात आले आहे.सध्या जगभर विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. ती आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे काय बदल घडतात, याचा अभ्यास कोण करतेय का? यात मूल्येही बदलत आहेत, हेही लक्षात घ्यावे, असे डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले. या वेळी मेढी व चांदोरकर यांनीही मते व्यक्त केली.

टॅग्स :Politicsराजकारण