शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:31 IST

शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.लोकवाङ्मयगृह व ठाणे मतदाता जागरण अभियानतर्फे शनिवारी शिरीष मेढी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त ‘जागतिक अर्थकारण, पर्यावरण व भारत’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी संजीव चांदोरकर यांच्या ‘अर्थाच्या दाहीदिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन कॉ. एम.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सोनाळकर म्हणाल्या की, पूर्वी विषमतेची चर्चा होत होती, पण आज विषमता वाढूनही त्याची जागतिक पातळीवरही चर्चा होत नाही. सरकार स्वत:ला कल्याणकारी म्हणवत असतानाही, विविध योजनांवर खर्च कमी करत आणले जात आहेत. भांडवलशाहीच्या अतिरेकामुळे विषमता वाढीस लागणार, हे सर्वांना माहीत होते, तरीही त्याचाच पुरस्कार जगभर होतो आहे. या विषमतावादी स्थितीचे दोन जग निर्माण झाले आहेत. यात मानवतावादी विचारही मागे पडत आहेत. मूल्य बदलली जात आहेत. नवीन बेदरकार संस्कृती निर्माण होत आहे.पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे म्हणाले, निसर्गातील कार्बन सायकल सुदृढ राहिली तरच पर्यावरण वाचेल. अन्यथा, पृथ्वीचे अस्तित्व संपुष्टात येईल. वातावरण बदलामुळे आदिवासी समूहांचे कुपोषण वाढले आहे. विकास व पर्यावरण ही दोन चाके आहेत. यात सध्या विकासाचे एकच चाक मोठे करण्याचा कार्यक्र म सुरू आहे. यामुळे हा रथ कोसळणार आहे. शहर विकास करताना गाड्या वाढतात व वनसंपत्ती नष्ट होते; पण यावर कोणी विचार करत नाही. शेती व शेतकरी यांचे आयुष्य पर्यावरण नाशामुळे संकटात आले आहे.सध्या जगभर विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. ती आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे काय बदल घडतात, याचा अभ्यास कोण करतेय का? यात मूल्येही बदलत आहेत, हेही लक्षात घ्यावे, असे डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले. या वेळी मेढी व चांदोरकर यांनीही मते व्यक्त केली.

टॅग्स :Politicsराजकारण