शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

ठाण्यातील १० पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दहा निरीक्षकांच्या आयुक्तालयाच्या बाहेर बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले ...

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दहा निरीक्षकांच्या आयुक्तालयाच्या बाहेर बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी हे आदेश काढले असून कालावधी पूर्ण झाल्याने रविवारपासून या निरीक्षकांना ठाणे शहरमधून कार्यमुक्त केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी काढलेल्या आदेशानुसार वरिष्ठ निरीक्षकांमध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्याचे संजय साबळे यांची ठाणे ग्रामीणमध्ये, निजामपुरा पोलीस ठाण्याचे विजय डोळस यांची रायगड, तर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे सुभाष कोकाटे यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. याशिवाय, अंबरनाथ वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची नाशिक शहर, उल्हासनगरच्या वाहतूक शाखेचे श्रीकांत धरणे यांची नवी मुंबईत, भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे अजय कांबळे यांचीही नवी मुंबईत तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट तीन उल्हासनगरचे संजू जॉन यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे रमेश जाधव यांची नवी मुंबईत, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे संजय पाटील यांची रायगड आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांची मुंबई शहर आयुक्तालयात बदली झाली आहे. प्रभारी अधिकारी यांनी या निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत.

* वर्षभरातच जनसंपर्क अधिकाऱ्याची बदली

वर्षभरापूर्वी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) सुखदा नारकर यांची मुंबईत बदली झाली होती. त्यांचा अतिरिक्त पदभार गुन्हे शाखेच्या एमपीडीए विभाग सांभाळणाऱ्या निरीक्षक सुवर्णा अडसुळे यांच्याकडे सोपविला होता. ठाणे आयुक्तालयातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने अडसुळे यांचीही आता बदली मुंबईत झाली आहे. मात्र, त्यांचा पीआरओचा पदभार अद्याप कोणाकडेही सोपविलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.