शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आपत्कालीन यंत्रणांची झाडाझडती, नाल्यांची डागडुजी ३१ मे पूर्वी करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:10 IST

मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे

भिवंडी : मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.भिवंडी शहर खाडीकिनारी असल्याने मुसळधार पाऊस सुरू असताना भरतीच्या काळात शहराला अनेकवेळा पुराचा फटका बसला आहे. शहरातील सर्व बाजूंचे सांडपाणी खाडीत सोडले जाते. अशावेळी खाडीला भरती आल्यानंतर ते पाणी खाडीत न जाता खाडीकिनाºयावरील क्षेत्रात थांबते. या काळात घेण्यात येणाºया खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये सर्व सरकारी विभागांचा समावेश व्हावा, यासाठी पालिका आयुक्त हिरे यांनी आपत्कालीन पूर्वनियोजन बैठक घेतली. या बैठकीला शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टोरंट पॉवर कंपनीचे अधिकारी, एसटी महामंडळ भिवंडी आगारप्रमुखांचे प्रतिनिधी, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.आयुक्त हिरे यांनी शहरातील परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर सांगितले की, शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील सर्व मुख्य नाल्यांची सफाई सुरू केली आहे. तसेच काही ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढवण्यात येत आहे. काही नाल्यांची डागडुजी सुरू केली आहे. हे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. तसेच गटारांची सफाई सुरू केली आहे. महापालिकेत मुख्य आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. आवश्यक साधनसामग्री तयार ठेवली आहे. तसेच नियंत्रण कक्षात वायरलेस सेवा,वॉकीटॉकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्व प्रभाग समिती कार्यालयात १ जूनपासून स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्वतंत्र कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात झाडे पडून दुर्घटना होऊ नये, म्हणून अगोदरच शहरातील झाडांची छाटणी सुरू केली आहे. तातडीची बाब म्हणून उद्यान विभागात स्वतंत्र झाडछाटणी पथक तैनात केले आहे. अग्निशमन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. खाडीकिनारी असलेली ईदगाह झोपडपट्टी, म्हाडा कॉलनी, संगमपाडा, अंबिकानगर, बंदर मोहल्ला या सर्व ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या शाळेत, सांस्कृतिक केंद्रात पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी नागरिकांची खाण्यापिण्याची सोय केली जाणार आहे. रस्त्यांचे नवीन खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिथे गटारावर उघडी झाकणे नाहीत, तेथे तातडीने नवीन झाकणे लावावीत, याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच डोंगरउतारावर राहणारे रहिवासी, झोपडपट्टीतील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, म्हणून अशा इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी