शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

या रे या सारे या; गोविंदा सण वाचवू या

By admin | Updated: July 4, 2017 06:52 IST

दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर व गोविंदांच्या वयावर घातलेले निर्बंध उठवावे, यासाठी आता महाराष्ट्रातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर व गोविंदांच्या वयावर घातलेले निर्बंध उठवावे, यासाठी आता महाराष्ट्रातील गोविंदा पथके सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. येत्या बुधवारी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महाआरती होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी ‘या रे या, सारे या गजाननाला आळवू या, महाआरती गाजवू या गोविंदा सण वाचवू या’ अशी साद सर्व गोविंदा पथकांना घालण्यात आली आहे. या वेळी सर्व गोविंदा आपापल्या पथकांचे टी-शर्ट घालून उपस्थित राहणार आहेत. दहीहंडी उत्सवात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोविंदांच्या सहभागास बंदी आणि २० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी बांधण्यास बंदी हे निर्बंध २०१४ साली हायकोर्टाने आणले. त्या वेळी हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि हा उत्सव साजरा झाला. ही स्थगिती ५६ दिवसांची होती. स्थगिती उठल्याने २०१५ आणि २०१६ साली या उत्सवावर हे निर्बंध कायम राहिले. याबाबत, दोन वर्षांपासून गोविंदा पथके नाराजी व्यक्त करत आहेत. या दोन अटींविरोधात दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान गोविंदा पथकाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. तो आजही सुरू आहे. १५ आॅगस्टला दहीहंडी उत्सव असून ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधीच सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली जाणार आहे. दहीहंडी समन्वय समितीतर्फे५ जुलैला संध्याकाळी महाआरती आयोजित केली असून त्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, पालघर, नालासोपारा येथील जवळपास ५०० ते ६०० गोविंदा पथके सहभागी होणार आहेत.‘ही साद आहे गोविंदा जगवण्यासाठीही तळमळ आहे जल्लोष टिकवण्यासाठीया आरतीद्वारे सिद्धिविनायकाला आळवण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल गोविंदा सण वाचवण्यासाठी...’ हा संदेश सोशल मीडियावर पाठवून पथकांना या महाआरतीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. ‘हीच वेळ आहे, आपण सगळे एकजूट होण्याची, सच्चा गोविंदा असाल आणि या सणासाठी थोडीशी आपुलकी तुमच्या मनात असेल, तर नक्की याल’ असा विश्वास समन्वय समितीने व्यक्त केला आहे. गंडांतर दूर व्हावे, हीच इच्छाआपल्या सणावर आलेले हे गंडांतर दूर व्हावे आणि मोकळ्या वातावरणात हा उत्सव पूर्वीसारखा जोमाने साजरा करता यावा, हेच मागणे मागण्यासाठी ही महाआरती असणार आहे. त्यानंतर, २०१७ मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.- समीर पेंढारे, सचिव, महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समिती