शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बिल्डरांसाठी ‘मेट्रो’ वंजारपट्टीवरून नेण्यास दोन आमदारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 01:20 IST

मेट्रोमार्गात बदल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर या मार्गास आमदार महेश चौघुले व रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत विरोध करणाऱ्यांना समाजकंटक संबोधल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

भिवंडी : ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प-५ अंतर्गत भिवंडीतील नियोजित मेट्रोमार्गात बदल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर या मार्गास आमदार महेश चौघुले व रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत विरोध करणाऱ्यांना समाजकंटक संबोधल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही आमदार हे रिलायन्स व इतर बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याने ते वंजारपट्टी नाक्यावरून मेट्रोमार्ग नेण्यास विरोध करीत आहेत, असा आरोप कल्याणनाका व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीने गुरु वारी पत्रकार परिषदेत केला.नियोजित मेट्रोमार्गामुळे कल्याण रोड येथील तब्बल १२०० व्यापारी व १७०० रहिवासी यांच्या मालमत्तांवर टाच येत असून येथील व्यापारी, रहिवासी तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या नियोजित मार्गास विरोध करत आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना फायद्याचे ठरेल, यासाठी हा मार्ग वंजारपट्टी-चाविंद्रामार्गे टेमघर, कल्याणच्या दिशेने नेल्यास त्याचा फायदा अधिक नागरिकांना होऊ शकेल, असे संघर्ष समितीचे निमंत्रक शादाब उस्मानी यांनी स्पष्ट केले.आमचा मेट्रोस विरोध नसून त्याचा मार्ग संपूर्ण शहरासाठी सोयीस्कर असा वंजारपट्टीवरून नेण्यासाठी आमचा आग्रह आहे. नियोजित कल्याणनाका येथील मार्ग हा छोटे व्यापारी, गरीब कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारा आहे. या मार्गावरील व्यावसायिक व रहिवासी आतापर्यंत तीनवेळा रस्ता रुंदीकरणात बाधित झाले आहेत. त्यातच आता मेट्रोमुळे या मार्गावरील सर्व व्यावसायिक उद्ध्वस्त होणार असल्याने सुरुवातीपासून येथील नागरिकांनी या मेट्रोमार्गास विरोध केला आहे.पत्रकार परिषदेस संघर्ष समितीचे राम लहारे, दिन मोहम्मद खान, मेहमूद मोमीन, राकेश पाल, सुधाकर अंचन, नईम खान, युसूफ सोलापूरकर, अनिल माणिकराव, नवीन गंगाराम, अस्लम हाफिजी, मुजाहिद शेख मैनूल शेख आदी उपस्थित होते.>स्थानिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी हा मार्ग असल्याने व या परिसरात रिलायन्स प्रोग्रेसिव्ह ट्रेडर्स कंपनीच्या नावे जमीन खरेदी केली असल्याने त्यांच्या फायद्यासाठी भिवंडीतील आमदार कल्याण रोडच्या मार्गास पसंती देत असल्याचा आरोप उस्मानी यांनी केला.