शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर, पालघरमध्ये फाटक, तर रायगडमध्ये मोरे यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:40 IST

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी रायगडच्या संपर्कप्रमुखपदी अनुक्रमे अनंत तरे आणि संजय मोरे; तर पालघरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी आमदार रवींद्र फाटक यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जाहीर होताच नाराजीला तोंड फुटले आहे. फाटक यांना पालघरमधून कट्टर शिवसैनिकांचा विरोध सुरू झाला आहे, तर आपल्या जिल्ह्यात नवा वाटेकरी आणल्याने अनंत तरे हेही नाराज असून त्यांनी वरपर्यंत दाद मागितल्याची चर्चा आहे.त्यातही मिशन २०१९ च्या नावाखाली नेमकी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातीलच दोन नेत्यांची वर्णी लागल्याने त्यांनी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चाही शिवसैनिकांत रंगू लागली आहे.पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार अनंत तरे यांच्याकडून पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पद काढून घेत त्यांना रायगडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी तरे यांनी या भागातून दोन वेळा खासदारकी आणि एकावेळेला आमदारकीची निवडणूक लढवल्याने हा भाग त्यांच्या परिचयाचा असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. पण पालघरमधील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसल्यानेच तरे यांची येथून उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जाते. तरे यांना रायगड जिल्हाही पूर्णपणे सोपवण्यात आलेला नाही. महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबागची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे; तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचीही रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.त्यांच्याकडे कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोघांकडे सोपवलेल्या परिसरात शिवसेनेचा एक-एक आमदार आहे. या दोघांची निवड करुन शिवसेनेने पुन्हा एकदा निष्ठावतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एका जिल्हाचे दोन भाग करण्यात आल्याने त्याबाबत नाराजी आहे.मोरे हे आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे; तर तरे यांना ठाण्यातून नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्यातूनच शेकाप किंवा राष्ट्रवादीविरोधात आमदारकीची निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच या दोघांना एकच जिल्हा विभागून देत दोघांनाही आपली प्रतिष्ठा वाढविण्याची संधी शिवसेनेच्या श्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांना पालघर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नेमत पक्षाने त्यांच्यावरही विश्वास टाकला आहे. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी त्यांची नेमणूक झाल्याची चर्चा आहे. परंतु त्यांच्या नावालाही स्थानिक नेत्यांचा विरोध सुरू झाला आहे.>ठाणे शहराकडे दुर्लक्ष?अर्थात मोरे आणि फाटक यांच्या नेमणुकीतून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत बलाढ्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ अधिक मजबूत केल्याचे मानले जाते. हे दोन्ही नेते वागळे पट्ट्यातील असल्याने त्यांच्या निवडीवरुनही पक्षात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी या दोघांची नावे पुढे केल्याची चर्चा सुरू आहे उरलेल्या ठाणे शहरातील नेते, तेथील निष्ठावंतांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.