शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘धोकादायक’ कारवाईला गुंडांमार्फत होतोय विरोध

By admin | Updated: November 4, 2016 03:26 IST

बेकायदा बांधकामांप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत धोकादायक बांधकामांचा मुद्दा गंभीर बनला आहे.

कल्याण : बेकायदा बांधकामांप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत धोकादायक बांधकामांचा मुद्दा गंभीर बनला आहे. अशाच एका धोकादायक बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ग प्रभाग अधिकारी स्वाती गरूड यांना नामचीन टोळीच्या गुडांनी विरोध केल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे रहिवाशांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असतानाच विरोधासाठी गुंड टोळ््यांचाही वापर होऊ लागल्याने अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातून वेळेत बंदोबस्त पुरवला जात नसल्याने कारवाई करायची तरी कशी? असा यक्षप्रश्न प्रभाग अधिकाऱ्यांपुढे आहे. पावसाळ््यापूर्वी केडीएमसीने धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द केली. त्यात ३५७ धोकादायक, २७९ अतिधोकादायक इमारती असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तशा नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या. परंतु ठोस कारवाई होत नसल्याने पुढे ही यादी कृतीअभावी कागदावरच राहते. अनेकदा प्रशासनातील ढिलाई, तर कधी रहिवाशांचा विरोध अशा दुहेरी कात्रीत ही मोहीम सापडलेली दिसते. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही तोपर्यंत घरे खाली न करण्याचा घेतलेला भाडेकरूंचा पवित्रा, मालक-भाडेकरू वाद आदी मुद्देही कारवाईत अडथळा आणतात. काही बांधकामांचे वाद न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईला मर्यादा येत आहेत. धोकादायक इमारती तोडण्यासाठी कंत्राटदारही नेमण्यात येऊनही कारवाई संथगतीने सुरू आहे. ग प्रभाग अधिकारी स्वाती गरूड या डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रेनगर परिसरात तळमजला अधिक पहिला मजला असलेल्या धोकादायक चाळीचे बांधकाम पाडण्यासाठी गेल्या होत्या. त्यासाठी रामनगर पोलिसांकडून बंदोबस्त मागविण्यात आला होता. परंतु तेथील अधिकाऱ्यांनी अपुरे पोलीस कर्मचारी असल्याचे कारण पुढे करीत बंदोबस्त पुरविण्यास असमर्थता दर्शविली. अखेर महापालिकेला दिलेल्या तुटपुंज्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गरूड घटनास्थळी रवाना झाल्या. कारवाईला प्रारंभ करताच रहिवाशांकडून मज्जाव झालाच, त्याचबरोबर गुंडांकडूनही अटकाव करण्यात आला. या विरोधाला न जुमानता त्यांनी संबंधित धोकादायक बांधकाम पूर्णपणे तोडले. विरोधासाठी गुंडांचा वापर झाल्याचा अहवाल आयुक्त ई. रवींद्रन यांना देणार असल्याची माहिती गरूड यांनी दिली. चाळमालकाचा विरोध नव्हता, परंतु भाडेकरूंचा विरोध होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ग प्रभागातील ६६ धोकादायक बांधकामांपैकी आतापर्यंत ११ वर कारवाई करण्यात आली असून लवकरच उरलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. >‘त्यांच्या’ संरक्षणाची जबाबदारी कोणाची?गरूड यांना गुडांकडून झालेला अटकाव पाहता जीवाला धोका निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असाच जीवघेणा प्रकार सहाय्यक आयुक्त कृष्णा लेंडेकर यांच्याबाबत घडला होता. अतिक्रमणविरोधी पथकात असलेले लेंडेकर अशाच एका बांधकामावर कारवाईसाठी गेले होते, तेव्हा अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटविण्याचा प्रकार दोन वर्षापूर्वी कचोरे येथे घडला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले. बांधकाम धोकादायक असो अथवा बेकायदा बांधकाम असो, त्यावर कारवाई करताना अधिकाऱ्यांना नेहमीच रहिवाशांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. महासभा आणि स्थायी समितीत अधिकाऱ्यांवर टीका करणारे नगरसेवक अशा हल्ल्यांवेळी त्यांच्या समर्थनासाठी, संरक्षणासाठी पुढे येत नाही. किमान पुरेशा संरक्षणासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अधिकाऱ्यांची भावना आहे.