शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
7
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
8
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
9
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
10
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
11
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
12
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
13
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
14
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
15
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
16
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
17
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
19
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
20
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठी लोकल सेवा खुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:41 IST

हितेंद्र ठाकूर : पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांच्याकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : राज्यातील अत्यावश्यक सेवा म्हणून महत्त्वाच्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्याचप्रकारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी अशा गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांनाही मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी लोकल ट्रेनच्या प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. वसई, विरार, नालासोपारा भागांत बविआने गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला धान्य तसेच आर्थिक मदत केली. या परिसरातील बहुतांश गंभीर आजारांच्या रु ग्णांची मुंबईतील केईएम, जे.जे., टाटा, नायर, भगवती यासारख्या रु ग्णालयांत उपचार सुरू आहेत. पण, सार्वजनिक परिवहन सेवा बंद असल्याने या आजाराने त्रस्त रु ग्णांचे हाल सुरू होते.

जुलैमध्ये सरकारने अनलॉक-१ ची प्रक्रि या सुरू केली. त्याचा भाग म्हणून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. यामध्ये गंभीर आजारांच्या रुग्णांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे वसई-विरारच नव्हे, तर मुंबईची उपनगरे तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, आसनगाव, वाशी, बेलापूर आणि पनवेल आदी ठिकाणच्या रु ग्णांना मुंबईत उपचारासाठी येणे अवघड झाले. त्यामुळे अनेकांचा घरातच मृत्यू झाला.हितेंद्र ठाकूर यांनी रेल्वेच्या सर्व बड्या अधिकाºयांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही पत्रआमदार क्षितिज ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहून गंभीर आजाराच्या रु ग्णांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती बविआने पत्राद्वारे केली आहे.