शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

उघडा बोडका मुंडा डोंगर झाला हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

ठाणे : गेली कित्येक वर्षे उघडा बोडका असलेला घोडबंदर येथील मुंडा डोंगर आता हिरवागार झाला आहे. हरियालीच्या १५ वर्षांच्या ...

ठाणे : गेली कित्येक वर्षे उघडा बोडका असलेला घोडबंदर येथील मुंडा डोंगर आता हिरवागार झाला आहे. हरियालीच्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, या डोंगरावर आता करंज, मोह, बेहडा, बाहवा, अर्जुन, आवळा, जांभूळ, आपटा अर्जुन इत्यादी झाडे ही ३० फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. या डोंगरावर आता ४०० झाडे वाढलेली दिसत आहेत. हरियालीने आपले उद्दिष्ट पूर्णत्त्वास नेले असून, या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

घोडबंदर रोड येथील गायमुख चेकनाक्याच्या आसपास आलेला मुंडा हा डोंगर असून, या डोंगरावर गेली अनेक वर्षे झाडे नसल्याने स्थानिकांनी या डोंगराला मुंडा डोंगर म्हणजेच टकल्या डोंगर असे नाव ठेवले. तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येतो. २००३च्या सुमारास हरियाली या संस्थेने ही जागा हेरली आणि आपल्या उद्दिष्टानुसार तेथे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्याचे योजिले. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे झाडी नाहीत म्हणून पावसाळ्यात माती वाहून जाते. मातीची धूप होते. माती नाही म्हणून झाडे नाहीत, असे दुष्टचक्र मोडणे म्हणजे हरियालीसाठी आव्हानच होते. झाडे लावण्यासाठी नऊ इंच ते एक फुटाचा खड्डा करणे म्हणजे अत्यंत जिकरीचे काम. त्यामुळे रोपे लावण्याचा पर्याय सोडून बीजरोपणामार्फतच वृक्षलागवड करावी, असे संस्थेने ठरविले. रोपांपेक्षा गवत झपाट्याने वाढत असल्याने गेले दोन वर्षे प्रयत्नांना यश येत नव्हते. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये गवत वाळले की, दुर्दैवाने काही समाजकंटक वणवा पेटवीत, अशी खंत हरियालीचे हंगामी अध्यक्ष प्रदीप लोथे यांनी व्यक्त केली. संस्थेने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आणि गवत वाळले की, त्यांनीच कापणी करायचे ठरविले आणि याचे उत्तम परिणाम दिसू लागला.

आज २००५मध्ये लावलेली करंजाची रोपटी पंचवीस तीस फूट उंचीचे वृक्ष झाले आहेत. लावलेली मोहाचीही रोपटी २० फुटांपर्यंत उंच झाली आहेत. करंजाची झाडे तर आता मदर ट्रीज झाली आहेत. त्यांच्यापासून हजारो शेंगासुद्धा मिळायला सुरुवात झाली आहे, असे संस्थेने सांगितले.

---------------------------

पावसाळ्याच्या सुरुवातीला बियांची किंवा छोट्या रोपांची लागवड केल्यानंतरची निगराणी म्हणजे फक्त गवत कापणे एवढेच हरियालीच्या हातात. रोज किंवा अधूनमधून पाणी घालणे, हेसुद्धा जवळपास अशक्यप्रायच. त्याबरोबर हरियालीने हेदेखील ठरवले की, कुठल्याही प्रकारची रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा उपयोग करायचा नाही. निसर्गाला त्याच्या कलेप्रमाणे वाढू द्यायचे. याचे तसे बघितले तर दोन तोटेच होते. पहिला म्हणजे मातीच मुळात कमी असल्यामुळे आणि तिचा कस कमी असल्यामुळे सुपीक जमिनीत जेवढ्या जोमाने झाडे वाढतात, त्यापेक्षा फारच कमी प्रमाणात झाडांची वाढ होत होती आणि दुसरे म्हणजे कमी कठीण, नाजूक जातीचे वृक्ष जसे आंबा, गुलमोहोर वगैरेसारखे वृक्ष येथे उन्हाळ्यात तग धरू शकले नाहीत. पण, निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करायचेच नाही असे ठरले. इतक्या वृक्ष विविधतेमुळे दर दीड ते दोन महिन्यांनी जंगलाचे रूप बदललेले दिसते आणि प्रत्येक वेळी एक वेगळाच आनंद मिळतो.

- प्रदीप लोथे

-------------