शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उघडा बोडका मुंडा डोंगर झाला हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

ठाणे : गेली कित्येक वर्षे उघडा बोडका असलेला घोडबंदर येथील मुंडा डोंगर आता हिरवागार झाला आहे. हरियालीच्या १५ वर्षांच्या ...

ठाणे : गेली कित्येक वर्षे उघडा बोडका असलेला घोडबंदर येथील मुंडा डोंगर आता हिरवागार झाला आहे. हरियालीच्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, या डोंगरावर आता करंज, मोह, बेहडा, बाहवा, अर्जुन, आवळा, जांभूळ, आपटा अर्जुन इत्यादी झाडे ही ३० फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. या डोंगरावर आता ४०० झाडे वाढलेली दिसत आहेत. हरियालीने आपले उद्दिष्ट पूर्णत्त्वास नेले असून, या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

घोडबंदर रोड येथील गायमुख चेकनाक्याच्या आसपास आलेला मुंडा हा डोंगर असून, या डोंगरावर गेली अनेक वर्षे झाडे नसल्याने स्थानिकांनी या डोंगराला मुंडा डोंगर म्हणजेच टकल्या डोंगर असे नाव ठेवले. तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येतो. २००३च्या सुमारास हरियाली या संस्थेने ही जागा हेरली आणि आपल्या उद्दिष्टानुसार तेथे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्याचे योजिले. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे झाडी नाहीत म्हणून पावसाळ्यात माती वाहून जाते. मातीची धूप होते. माती नाही म्हणून झाडे नाहीत, असे दुष्टचक्र मोडणे म्हणजे हरियालीसाठी आव्हानच होते. झाडे लावण्यासाठी नऊ इंच ते एक फुटाचा खड्डा करणे म्हणजे अत्यंत जिकरीचे काम. त्यामुळे रोपे लावण्याचा पर्याय सोडून बीजरोपणामार्फतच वृक्षलागवड करावी, असे संस्थेने ठरविले. रोपांपेक्षा गवत झपाट्याने वाढत असल्याने गेले दोन वर्षे प्रयत्नांना यश येत नव्हते. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये गवत वाळले की, दुर्दैवाने काही समाजकंटक वणवा पेटवीत, अशी खंत हरियालीचे हंगामी अध्यक्ष प्रदीप लोथे यांनी व्यक्त केली. संस्थेने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आणि गवत वाळले की, त्यांनीच कापणी करायचे ठरविले आणि याचे उत्तम परिणाम दिसू लागला.

आज २००५मध्ये लावलेली करंजाची रोपटी पंचवीस तीस फूट उंचीचे वृक्ष झाले आहेत. लावलेली मोहाचीही रोपटी २० फुटांपर्यंत उंच झाली आहेत. करंजाची झाडे तर आता मदर ट्रीज झाली आहेत. त्यांच्यापासून हजारो शेंगासुद्धा मिळायला सुरुवात झाली आहे, असे संस्थेने सांगितले.

---------------------------

पावसाळ्याच्या सुरुवातीला बियांची किंवा छोट्या रोपांची लागवड केल्यानंतरची निगराणी म्हणजे फक्त गवत कापणे एवढेच हरियालीच्या हातात. रोज किंवा अधूनमधून पाणी घालणे, हेसुद्धा जवळपास अशक्यप्रायच. त्याबरोबर हरियालीने हेदेखील ठरवले की, कुठल्याही प्रकारची रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा उपयोग करायचा नाही. निसर्गाला त्याच्या कलेप्रमाणे वाढू द्यायचे. याचे तसे बघितले तर दोन तोटेच होते. पहिला म्हणजे मातीच मुळात कमी असल्यामुळे आणि तिचा कस कमी असल्यामुळे सुपीक जमिनीत जेवढ्या जोमाने झाडे वाढतात, त्यापेक्षा फारच कमी प्रमाणात झाडांची वाढ होत होती आणि दुसरे म्हणजे कमी कठीण, नाजूक जातीचे वृक्ष जसे आंबा, गुलमोहोर वगैरेसारखे वृक्ष येथे उन्हाळ्यात तग धरू शकले नाहीत. पण, निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करायचेच नाही असे ठरले. इतक्या वृक्ष विविधतेमुळे दर दीड ते दोन महिन्यांनी जंगलाचे रूप बदललेले दिसते आणि प्रत्येक वेळी एक वेगळाच आनंद मिळतो.

- प्रदीप लोथे

-------------