शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

अवघे सात टक्केच काम, मलनिस्सारण प्रकल्पाबाबत आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:22 IST

मलनिस्सारण प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनसाठी कंत्राटदाराला आठ महिन्यांपूर्वी केडीएमसी प्रशासनाने कार्यादेश दिला आहे.

कल्याण : मलनिस्सारण प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनसाठी कंत्राटदाराला आठ महिन्यांपूर्वी केडीएमसी प्रशासनाने कार्यादेश दिला आहे. मात्र, या काळात केवळ सात टक्केच काम झाले असताना त्या बदल्यात ६० टक्के रक्कम कंत्राटदाराला महापालिकेने दिली आहे. कंत्राटदाराच्या या दिरंगाईबद्दल नगरसेवकांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनचे काम किती टक्के झाले आहे, असा सवाल केला. त्यावर स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाकडे खुलासा मागतला. कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते म्हणाले, ‘प्रकल्पाच्या कामाचा कार्यादेश ८ आॅगस्ट २०१७ ला दिला आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे काम सात टक्के झाले आहे. प्रकल्प हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जात आहे. त्यावर प्राधिकरणाचे संपूर्ण नियंत्रण आहे. पैसे केवळ महापालिका देते. कंत्राटदार कंपनीने कामासाठी जे साहित्य मागवले आहे, त्याच्या बदल्यात कंपनीला महापालिकेने ६० टक्के रक्कम दिली आहे. ही रक्कम देण्याची अट कंत्राटदाराच्या करारपत्रात नमूद आहे. त्यानुसार ही रक्कम दिली आहे.’कोलते यांच्या या माहितीवर नगरसेवक नीलेश शिंदे, रमेश म्हात्रे, नगरसेविका माधुरी काळे यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका पैसे देते, नियंत्रण मात्र प्राधिकरण ठेवणार आहे. तर महापालिकेचे अधिकारी काम किती टक्के झाले, पैसे किती दिले, याचा हिशेब ठेवणार आहेत की नाही, संबंधित कंत्राटदाराच्या संथगतीप्रकरणी त्याला काही नोटिसा काढणार आहेत की नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यावर कोलते यांनी कंत्राटदाराला चार नोटिसा काढल्या आहेत. तसेच त्या नोटिसा माहितीसाठी प्राधिकरणाकडे पाठवल्या आहेत, असे सांगितले. त्यावर त्याचे पुढे काय झाले, असा प्रतिप्रश्न नगरसेवकांनी केला. तेव्हा दर आठवड्याला कामाच्या प्रगतीचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर केला जाईल, असे आश्वासन कोलते यांनी दिले आहे.कंत्राटदाराने कामात दिरंगाई करून वाढीव खर्च मागितल्यावर महापालिका त्याला वाढीव खर्च देणार आहे का?, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. तेव्हा वाढीव खर्च देण्याची तरतूद नसल्याचे कोलते यांनी स्पष्ट केले. कंत्राटदाराने आतापर्यंत ३ हजार चेंबर्स बांधले आहेत. कंत्राटदाराला आणखी २० हजार चेंबर्स बांधायचे आहेत.>हरित योजनेच्या जागेत अतिक्रमणकेंद्र सरकारने हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी महापालिकेस मंजूर केला आहे. या योजनेतून उंबर्डे परिसरात हरित क्षेत्र विकसित केले जाणार आहे. तेथे सायकल ट्रॅक बांधणेही प्रस्तावित आहे. परंतु, या जागेत आधीच अतिक्रमण होत आहे. त्याविरोधात महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नाहीत, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी मांडला. अतिक्रमणविरोधी पथकातील पोलीस बसून पगार घेत आहेत. महापालिका सामान्यांच्या घरावर कारवाई करते. तर प्रकल्पातील अतिक्रमण हटविण्याच्या तक्रारीची दखल घेत नाही, यावर सभापती दामले यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र सभेला उपायुक्त सुरेश पवार अनुपस्थित असल्याने, यावर फारशी चर्चा झाली आहे.