शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

केडीएमटीच्या अर्थसंकल्पातील तरतुदी राहिल्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:00 IST

लोकप्रतिनिधींकडून भरघोस निधी; पण, पालिकेकडून हात आखडता

- प्रशांत मानेकल्याण : लोकप्रतिनिधींकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भरघोस निधीची तरतूद केडीएमटीसाठी केली जाते, परंतु केडीएमसीकडून हात आखडता घेतला जात असल्याने त्या तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. मागील वर्षी परिवहनकडून अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन सभापती सुभाष म्हस्के यांनी महापालिकेच्या असहकार्याबाबत परखड मत मांडले होते. याउपरही परिस्थिती कायम आहे. दरम्यान, शुक्रवारी यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जाणार आहे. यात परिवहन सभापती मनोज चौधरी काय भाष्य करतात? याकडे लक्ष लागले आहे.केडीएमटी व्यवस्थापनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये सात कोटींची वाढ करीत परिवहन समितीने ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, अशा दोन कोटी १० लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला २२ जानेवारीच्या परिवहनच्या विशेष सभेत मान्यता दिली आहे. भांडवली आणि महसुली अनुदानाबरोबरच भविष्य निर्वाह निधीत वाढ करताना मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. आता हा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीला सादर केला जाईल. दरम्यान स्थायी समितीकडून महासभा असा प्रवास घडताना लोकप्रतिनिधींकडून केडीएमटीच्या अर्थसंकल्पात मांडल्या गेलेल्या तरतुदींमध्ये भर टाकून भरघोस निधीची तजवीज परिवहन उपक्रमासाठी केली जाते. परंतु, आजवरचा अनुभव पाहता तरतूद केलेला निधी पूर्णपणे उपक्रमाकडे वर्ग होत नाही तर घोषणा झालेले प्रकल्प हे अंमलबजावणीअभावी कागदोपत्रीच राहतात.गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महासभेने उपक्रमासाठी महसुलीसाठी सहा कोटी व भांडवली खर्चासाठी १८ कोटींची तरतूद केली होती. भांडवली तरतूद मिळाली परंतु, महसुली खर्चासाठी दिलेल्या सहा कोटींच्या तरतुदींमधील वर्षभरात ५० लाखांचा निधी मिळाला आहे. तर, नवीन बस खरेदी, वर्कशॉप व आगारातील सुधारणा, बसथांबे आदी कामासाठी सहा कोटींची तरतूद स्थायीने महासभेला सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली होती. या व्यतिरिक्त गणेशघाट आगारासाठी ६४ लाख व खंबाळपाडा आगार विकसित करण्यासाठी तीन कोटींची तरतूद केली होती. परंतु, ही कामे सुरू झालेली नाहीत. केडीएमटी लोकाभिमुख करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, वारंवार घटत असलेले उत्पन्न पाहता हा उपक्रम किती लोकाभिमुख झाला याची प्रचिती येते.खाजगीकरणाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षगेल्या अर्थसंकल्पीय महासभेत भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी केडीएमटीच्या तरतुदींवर भाष्य करताना परिवहनच्या खाजगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता.खाजगीकरण केल्यानंतर ५० ते ६० कोटींची बचत होईल, याकडेही लक्ष वेधले होते. परंतु, आजच्याघडीला खाजगीकरण किंवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) सारख्या तत्सम प्रस्तावाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.