शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

केडीएमटीच्या अर्थसंकल्पातील तरतुदी राहिल्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:00 IST

लोकप्रतिनिधींकडून भरघोस निधी; पण, पालिकेकडून हात आखडता

- प्रशांत मानेकल्याण : लोकप्रतिनिधींकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भरघोस निधीची तरतूद केडीएमटीसाठी केली जाते, परंतु केडीएमसीकडून हात आखडता घेतला जात असल्याने त्या तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. मागील वर्षी परिवहनकडून अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन सभापती सुभाष म्हस्के यांनी महापालिकेच्या असहकार्याबाबत परखड मत मांडले होते. याउपरही परिस्थिती कायम आहे. दरम्यान, शुक्रवारी यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जाणार आहे. यात परिवहन सभापती मनोज चौधरी काय भाष्य करतात? याकडे लक्ष लागले आहे.केडीएमटी व्यवस्थापनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये सात कोटींची वाढ करीत परिवहन समितीने ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, अशा दोन कोटी १० लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला २२ जानेवारीच्या परिवहनच्या विशेष सभेत मान्यता दिली आहे. भांडवली आणि महसुली अनुदानाबरोबरच भविष्य निर्वाह निधीत वाढ करताना मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. आता हा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीला सादर केला जाईल. दरम्यान स्थायी समितीकडून महासभा असा प्रवास घडताना लोकप्रतिनिधींकडून केडीएमटीच्या अर्थसंकल्पात मांडल्या गेलेल्या तरतुदींमध्ये भर टाकून भरघोस निधीची तजवीज परिवहन उपक्रमासाठी केली जाते. परंतु, आजवरचा अनुभव पाहता तरतूद केलेला निधी पूर्णपणे उपक्रमाकडे वर्ग होत नाही तर घोषणा झालेले प्रकल्प हे अंमलबजावणीअभावी कागदोपत्रीच राहतात.गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महासभेने उपक्रमासाठी महसुलीसाठी सहा कोटी व भांडवली खर्चासाठी १८ कोटींची तरतूद केली होती. भांडवली तरतूद मिळाली परंतु, महसुली खर्चासाठी दिलेल्या सहा कोटींच्या तरतुदींमधील वर्षभरात ५० लाखांचा निधी मिळाला आहे. तर, नवीन बस खरेदी, वर्कशॉप व आगारातील सुधारणा, बसथांबे आदी कामासाठी सहा कोटींची तरतूद स्थायीने महासभेला सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली होती. या व्यतिरिक्त गणेशघाट आगारासाठी ६४ लाख व खंबाळपाडा आगार विकसित करण्यासाठी तीन कोटींची तरतूद केली होती. परंतु, ही कामे सुरू झालेली नाहीत. केडीएमटी लोकाभिमुख करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, वारंवार घटत असलेले उत्पन्न पाहता हा उपक्रम किती लोकाभिमुख झाला याची प्रचिती येते.खाजगीकरणाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षगेल्या अर्थसंकल्पीय महासभेत भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी केडीएमटीच्या तरतुदींवर भाष्य करताना परिवहनच्या खाजगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता.खाजगीकरण केल्यानंतर ५० ते ६० कोटींची बचत होईल, याकडेही लक्ष वेधले होते. परंतु, आजच्याघडीला खाजगीकरण किंवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) सारख्या तत्सम प्रस्तावाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.