शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

जिल्ह्यात अवघे २७ टक्केच लसीकरण, डेल्टा प्लसला रोखायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली आहे. तशीच चिंता ठाणे जिल्ह्यातही वाढली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली आहे. तशीच चिंता ठाणे जिल्ह्यातही वाढली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी आता लसीकरणदेखील थांबले आहे. त्यातच आता डेल्टा प्लसची भर पडल्याने कोरोनाला रोखायचे कसे, असा पेच निर्माण होणार आहे. डेल्टा प्लसला रोखायचे असेल तर त्यासाठी लसीकरण होणे गरेजेचे आहे. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या अवघे २७ टक्केच लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे २१ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सहा टक्के आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात आता डेल्टा प्लसनेदेखील जिल्ह्यात चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात अद्यापही डेल्टाचा रुग्ण आढळला नसला तरी त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हेरिएन्टला रोखायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार ४०७ लोकसंख्येच्या ठाणे जिल्ह्यात केवळ १९ लाख ८६ हजार ३०४ नागरिकांचे म्हणजेच २७ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यातही पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण यात २१ टक्के असून दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण अवघे सहा टक्केच असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. तालक्यानिहाय विचार केल्यास ठाण्यात २२ लाख लोकसंख्येपैकी २८ टक्के म्हणजेच इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिकचे लसीकरण झाले आहे. त्यातही पहिला डोस २१ टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस सात टक्के नागरिकांना दिला आहे. १० लाख ४ हजार ३४६ लोकसंख्येच्या मीरा-भाईंदर शहरात ३८ टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण २८ आणि दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण १० टक्के एवढे आहे. नवी मुंबईतदेखील १५ लाख २ हजार २१० लोकसंख्येपैकी ३६ टक्के लसीकरण झाले असून यामध्ये पहिला डोस २७ टक्के आणि दुसरा डोस नऊ टक्के नागरिकांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीत १९ लाख १६ हजार ८६३ लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस १९ टक्के आणि चार टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भिवंडीमध्ये ७ लाख ११ हजार ३२३ लोकसंख्येपैकी १३ टक्के लोकसंख्येचे पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. यामध्ये ११ टक्के पहिला डोस आणि २ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. उल्हासनगरमध्ये ५ लाख ६ हजार लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. यामध्ये १७ टक्के नागरिकांचा पहिला आणि तीन टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. तर ठाणे ग्रामीणमधील २० लाख ५८ हजार ७५५ लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिकांचे पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाला आहे. यामध्ये १९ टक्के नागरिकांचा पहिला आणि तीन टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील लसीकरण

एकूण लसीकरण - १९,८६,३०४

पहिला डोस - १५,४७,३५१

दुसरा डोस - ४,३८,९५३

कोणत्या तालुक्यात किती? (ग्राफ)

पहिला डोस - दुसरा डोस

ठाणे ग्रामीण - २,९०,१५५ - ६३,०५८

कल्याण-डोंबिवली - २,६०,६०३ - ६२,२५३

उल्हासनगर - ६५,१६२ - १२,८२९

भिवंडी - ५७,४७१ - ११,८०९

ठाणे - ३,५१,९९० - १,११,१२५

मीराभाईंदर - २,१९,५४३ - ७५,५४२

नवी मुंबई - ३,०२,४२७ - १,०२,३३७

१८ ते ४४ वयोगटात केवळ ५.७ टक्के लसीकरण

१८ ते ४४ हा वयोगट सर्वात महत्त्वाचा वयोगट मानला जात आहे. कामाच्या निमित्ताने याच वयोगटातील नागरिक सर्वाधिक प्रमाणात बाहेर असतो. त्यामुळे डेल्टा प्लसला रोखायचे असल्यास या वयोगटाचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. परंतु, मध्यंतरी सुरू केलेल्या या वयोगटातील लसीकरणाला लस उपलब्ध नसल्याने ब्रेक लागला होता. आता पुन्हा ते सुरू झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत या वयोगटातील २ लाख ५६ हजार १२३ नागरिकांचे म्हणजेच अवघे ५.७ टक्केच लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे.