शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवघे २७ टक्केच लसीकरण, डेल्टा प्लसला रोखायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली आहे. तशीच चिंता ठाणे जिल्ह्यातही वाढली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली आहे. तशीच चिंता ठाणे जिल्ह्यातही वाढली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी आता लसीकरणदेखील थांबले आहे. त्यातच आता डेल्टा प्लसची भर पडल्याने कोरोनाला रोखायचे कसे, असा पेच निर्माण होणार आहे. डेल्टा प्लसला रोखायचे असेल तर त्यासाठी लसीकरण होणे गरेजेचे आहे. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या अवघे २७ टक्केच लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे २१ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सहा टक्के आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात आता डेल्टा प्लसनेदेखील जिल्ह्यात चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात अद्यापही डेल्टाचा रुग्ण आढळला नसला तरी त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हेरिएन्टला रोखायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार ४०७ लोकसंख्येच्या ठाणे जिल्ह्यात केवळ १९ लाख ८६ हजार ३०४ नागरिकांचे म्हणजेच २७ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यातही पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण यात २१ टक्के असून दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण अवघे सहा टक्केच असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. तालक्यानिहाय विचार केल्यास ठाण्यात २२ लाख लोकसंख्येपैकी २८ टक्के म्हणजेच इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिकचे लसीकरण झाले आहे. त्यातही पहिला डोस २१ टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस सात टक्के नागरिकांना दिला आहे. १० लाख ४ हजार ३४६ लोकसंख्येच्या मीरा-भाईंदर शहरात ३८ टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण २८ आणि दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण १० टक्के एवढे आहे. नवी मुंबईतदेखील १५ लाख २ हजार २१० लोकसंख्येपैकी ३६ टक्के लसीकरण झाले असून यामध्ये पहिला डोस २७ टक्के आणि दुसरा डोस नऊ टक्के नागरिकांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीत १९ लाख १६ हजार ८६३ लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस १९ टक्के आणि चार टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भिवंडीमध्ये ७ लाख ११ हजार ३२३ लोकसंख्येपैकी १३ टक्के लोकसंख्येचे पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. यामध्ये ११ टक्के पहिला डोस आणि २ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. उल्हासनगरमध्ये ५ लाख ६ हजार लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. यामध्ये १७ टक्के नागरिकांचा पहिला आणि तीन टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. तर ठाणे ग्रामीणमधील २० लाख ५८ हजार ७५५ लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिकांचे पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाला आहे. यामध्ये १९ टक्के नागरिकांचा पहिला आणि तीन टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील लसीकरण

एकूण लसीकरण - १९,८६,३०४

पहिला डोस - १५,४७,३५१

दुसरा डोस - ४,३८,९५३

कोणत्या तालुक्यात किती? (ग्राफ)

पहिला डोस - दुसरा डोस

ठाणे ग्रामीण - २,९०,१५५ - ६३,०५८

कल्याण-डोंबिवली - २,६०,६०३ - ६२,२५३

उल्हासनगर - ६५,१६२ - १२,८२९

भिवंडी - ५७,४७१ - ११,८०९

ठाणे - ३,५१,९९० - १,११,१२५

मीराभाईंदर - २,१९,५४३ - ७५,५४२

नवी मुंबई - ३,०२,४२७ - १,०२,३३७

१८ ते ४४ वयोगटात केवळ ५.७ टक्के लसीकरण

१८ ते ४४ हा वयोगट सर्वात महत्त्वाचा वयोगट मानला जात आहे. कामाच्या निमित्ताने याच वयोगटातील नागरिक सर्वाधिक प्रमाणात बाहेर असतो. त्यामुळे डेल्टा प्लसला रोखायचे असल्यास या वयोगटाचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. परंतु, मध्यंतरी सुरू केलेल्या या वयोगटातील लसीकरणाला लस उपलब्ध नसल्याने ब्रेक लागला होता. आता पुन्हा ते सुरू झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत या वयोगटातील २ लाख ५६ हजार १२३ नागरिकांचे म्हणजेच अवघे ५.७ टक्केच लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे.