शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जिल्ह्यातील गावपाड्यात अवघे २० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या ...

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या गावपातळीवरील सहा लाख १७ हजार ६३३ जणांच्या लसीकरणापैकी २० टक्के म्हणजे एक लाख ४२ हजार २०३ जणांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. यात अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शहरांचाही समावेश आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांसह नगरपालिकांच्या शहर परिसरात आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रारंभापासून सुरू आहे. शहरी भागाच्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आतार्यंत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धा व गैरसमज झालेला असल्याने त्यांच्याकडून लसीकरणाला फारसा प्रतिसाद दिला जात नाही. या गावपाड्यातील ४ लाख ५७ हजार ९३८ या एकूण लसीकरणापैकी आजपर्यंत १ लाख ३ हजार २८२ जणांचे म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांचे गावखेड्यात लसीकरण झाले आहे. या ग्रामीण भागात अजूनही ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे लसीकरण तब्बल बाकी आहे.

तर नगर परिषद ‌क्षेत्रात १ लाख ५९ हजार ६९४ जण लसीकरणाचे लाभार्थी आहेत. यापैकी ३७ हजार‌ ९२१ जणांचे (२० टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण व नगर परिषद क्षेत्रात एक लाख २४ हजार ९११ जणांनी पहिला डोस पूर्ण केला असून दुसरा डोस १६ हजार २९२ जणांनी आरोग्य विभागाच्या नियंत्रणात पूर्ण केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील गावपाड्यांच्या ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे व नगर परिषदेच्या १ लाख २७ हजार ९७३ जणांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. गैरसमज आणि अंधश्रद्धा आणि त्यात लसचा तुटवडा असल्याने लसीकरण कमी झाल्याचे वास्तव ग्रामीण भागात दिसून येत आहे.