शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

जिल्ह्यातील गावपाड्यात अवघे २० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या ...

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या गावपातळीवरील सहा लाख १७ हजार ६३३ जणांच्या लसीकरणापैकी २० टक्के म्हणजे एक लाख ४२ हजार २०३ जणांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. यात अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शहरांचाही समावेश आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांसह नगरपालिकांच्या शहर परिसरात आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रारंभापासून सुरू आहे. शहरी भागाच्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आतार्यंत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धा व गैरसमज झालेला असल्याने त्यांच्याकडून लसीकरणाला फारसा प्रतिसाद दिला जात नाही. या गावपाड्यातील ४ लाख ५७ हजार ९३८ या एकूण लसीकरणापैकी आजपर्यंत १ लाख ३ हजार २८२ जणांचे म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांचे गावखेड्यात लसीकरण झाले आहे. या ग्रामीण भागात अजूनही ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे लसीकरण तब्बल बाकी आहे.

तर नगर परिषद ‌क्षेत्रात १ लाख ५९ हजार ६९४ जण लसीकरणाचे लाभार्थी आहेत. यापैकी ३७ हजार‌ ९२१ जणांचे (२० टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण व नगर परिषद क्षेत्रात एक लाख २४ हजार ९११ जणांनी पहिला डोस पूर्ण केला असून दुसरा डोस १६ हजार २९२ जणांनी आरोग्य विभागाच्या नियंत्रणात पूर्ण केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील गावपाड्यांच्या ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे व नगर परिषदेच्या १ लाख २७ हजार ९७३ जणांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. गैरसमज आणि अंधश्रद्धा आणि त्यात लसचा तुटवडा असल्याने लसीकरण कमी झाल्याचे वास्तव ग्रामीण भागात दिसून येत आहे.