शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

जिल्ह्यातील गावपाड्यात अवघे २० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या ...

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी गावखेड्यात आधीच गैरसमज झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. या गावपातळीवरील सहा लाख १७ हजार ६३३ जणांच्या लसीकरणापैकी २० टक्के म्हणजे एक लाख ४२ हजार २०३ जणांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. यात अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शहरांचाही समावेश आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांसह नगरपालिकांच्या शहर परिसरात आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रारंभापासून सुरू आहे. शहरी भागाच्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आतार्यंत लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धा व गैरसमज झालेला असल्याने त्यांच्याकडून लसीकरणाला फारसा प्रतिसाद दिला जात नाही. या गावपाड्यातील ४ लाख ५७ हजार ९३८ या एकूण लसीकरणापैकी आजपर्यंत १ लाख ३ हजार २८२ जणांचे म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांचे गावखेड्यात लसीकरण झाले आहे. या ग्रामीण भागात अजूनही ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे लसीकरण तब्बल बाकी आहे.

तर नगर परिषद ‌क्षेत्रात १ लाख ५९ हजार ६९४ जण लसीकरणाचे लाभार्थी आहेत. यापैकी ३७ हजार‌ ९२१ जणांचे (२० टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण व नगर परिषद क्षेत्रात एक लाख २४ हजार ९११ जणांनी पहिला डोस पूर्ण केला असून दुसरा डोस १६ हजार २९२ जणांनी आरोग्य विभागाच्या नियंत्रणात पूर्ण केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील गावपाड्यांच्या ३ लाख ६४ हजार ७४८ जणांचे व नगर परिषदेच्या १ लाख २७ हजार ९७३ जणांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. गैरसमज आणि अंधश्रद्धा आणि त्यात लसचा तुटवडा असल्याने लसीकरण कमी झाल्याचे वास्तव ग्रामीण भागात दिसून येत आहे.