शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आॅनलाइन कंपनीने महिलेला घातला २१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:30 IST

भारतामध्ये आॅनलाइन मार्केटिंग कंपनी सुरू करत असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट नफा मिळेल, असे आश्वासन देऊन २१ लाखांची फसवणूक केली आहे.

अंबरनाथ : भारतामध्ये आॅनलाइन मार्केटिंग कंपनी सुरू करत असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट नफा मिळेल, असे आश्वासन देऊन २१ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबरनाथचा रहिवासी असलेला गिरीश नायर हा २० ते २५ वर्षे दुबईमध्ये पत्नीसह राहत आहे. दुबईमध्ये आॅनलाइन मार्केटिंगचे काम करतो. गिरीश याची आई आणि सासू, सासरे अंबरनाथलाच राहतात. त्यामुळे त्याचे अंबरनाथला येणेजाणे आहे. मार्च २०१७ मध्ये गिरीश अंबरनाथला आला असता त्याने भारतात आॅनलाइन मार्केटिंग कंपनी सुरू करणार असल्याचे मनीषा रोठे यांचा मुलगा प्रतीक याला सांगितले. त्यानंतर प्रतीकने याबाबत आई मनीषा यांना माहिती दिली. कंपनी आणि त्यातील गुंतवणुकीविषयी माहिती घेण्यासाठी प्रतीक आणि त्याची आई हे गिरीशच्या घरी गेले. तेव्हा गिरीशने व्हिस्टा ईगल ग्लोबल या आॅनलाइन मार्केटिंग कंपनीबाबत माहिती दिली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन वर्षांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल, असे आमिष दाखवले. सोबत कंपनीतील नफ्यातून एक टक्का रक्कम मिळेल, असे सांगितले. गिरीश याने त्या कंपनीत मनीषा यांना २५ लाख गुंतवण्यास सांगितले. मात्र, मनीषा यांनी २१ लाख गुंतवण्याची तयारी दर्शवली. कंपनीत जे पैसे गुंतवणे अपेक्षित होते त्या कंपनीच्या नावाने धनादेश देण्यास मनीषा तयार झाल्या.सुरुवातीपासून फसवणुकीच्या तयारीत असलेल्या नायर याने ते धनादेश त्याची आई नागलक्ष्मी नायर आणि सासरे रमेश सारडा यांच्या नावाने देण्यास सांगितले. त्यानुसार मनीषा यांनी ९ लाख, नंतर ७ लाख आणि त्यापाठोपाठ ५ लाख असे एकूण २१ लाख दिले. मात्र, वर्ष उलटूनही कंपनीचा कोणताच पत्ता नसल्याने मनीषा यांनी नायर यांना विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. अखेर मनीषा यांनी कंपनीची वेबसाइट पाहिली असता त्यात संचालक म्हणून भलतीच नावे आढळली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर मनीषा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. २३ मे रोजी तक्रार दिल्यावर आरोपी नायर याने त्याच्या ओळखीतील काही व्यक्तींना मध्यस्थी करत पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बैठक झाल्यावर पैसे परत मिळतील, या आशेवर तक्रार मागे घेतली. मात्र, समझोता झाल्यावर दिलेला धनादेश बँकेत वठलाच नाही. त्यामुळे मनीषा यांनी गिरीश नायर, त्याची पत्नी शीतल नायर, आई नागलक्ष्मी नायर आणि सासरे रमेश सारडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.>सर्व आरोपी गायबगुन्हा दाखल झाल्यापासून चारही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. तर, गिरीश हा परदेशात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अन्य आरोपींना अटक करून या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत.