शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

ओएनजीसीने भरपाईची माहिती नाकारली

By admin | Updated: October 30, 2015 23:46 IST

समुुद्रातील तेलसंशोधन सर्व्हेमुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना दिलेली नुकसानभरपाई, नुकसानभरपाईसाठी मंजूर झालेले प्रस्ताव

वसई : समुुद्रातील तेलसंशोधन सर्व्हेमुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना दिलेली नुकसानभरपाई, नुकसानभरपाईसाठी मंजूर झालेले प्रस्ताव, ओएनजीसीच्या भूगर्भ समन्वय समितीतील मच्छीमारांच्या प्रतिनिधींना वा त्यांच्या संघटनांना ओएनजीसीकडून देण्यात आलेले लाभ यासह विविध याद्यांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाविरोधात कोळी युवाशक्तीचे दिलीप माठक यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील दाखल केले आहे.केंद्राच्या अखत्यारीतील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अरबी समुद्रात तेलसंशोधन मोहीम राबवत असते. यासाठी परदेशी कंपन्यांना सर्व्हेचे कंत्राट देण्यात येते. सर्व्हे राबवताना मच्छीमारांचा समावेश असलेल्या समन्वय समितीला ओएनजीसी विश्वासात घेते, असे सांगितले जाते. या प्रत्येक सर्व्हेच्या वेळी स्थानिक मच्छीमार बाधित होत असतात. या मच्छीमारांना ओएनजीसीकडून नुकसानभरपाई दिली जात असल्याचा दावाही अनेकदा केला जातो. या पार्श्वभूमीवर वसईच्या पाचूबंदर-किल्लाबंदर येथील कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी ओएनजीसीच्या वांद्रे येथील कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करून सहा मुद्यांवर माहिती मागितली होती. या अर्जावर ओएनजीसीचे केंद्रीय जनमाहिती अधिकारी सोयेश रंजन यांनी माठक यांना पाठवलेल्या पत्रात संबंधित कार्यालयात आपणास हवी असलेली माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही माहिती पुरवू शकत नाही, असे सांगितले. ओएनजीसीच्या मुंबई प्रदेश कार्यालयातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, काही हाती लागले नाही. यामुळे आम्ही उरण येथील कार्यालयातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे उत्तर माठक यांना देण्यात आले. यानंतर माठक यांचा अर्ज ओएनजीसीच्या उरण कार्यालयात रवाना करण्यात आला. मात्र, त्यांनीही हात झटकले. त्यामुळे व्यथित झालेल्या माठक यांनी ओएनजीसीचे नवी दिल्लीतील प्रथम अपीलिय अधिकारी आलोक मिश्रा यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. पहिल्या अपिलावर ४५ दिवसांत सुनावणी घेणे कायद्याने बंधनकारक आहे, असे असूनही मिश्रा यांनी माठक यांच्या अपिलावर सुनावणी घेण्याचेच टाळले. परिणामी, माठक यांनी आता थेट केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांकडेच या प्रकरणी दाद मागितली आहे.अनेक वेळा सर्व्हेमुळे बाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई दिली गेल्याचे दावे केले जातात. तथापि, माठक यांच्या अर्जावर ओएनजीसीने नुकसानभरपाईची माहिती देणे टाळल्यामुळे ओएनजीसीकडून कोणतीही नुकसानभरपाई दिली जात नसल्याचेच यामुळे चित्र निर्माण झालेय. त्यामुळे ओएनजीसीच्या समन्वय समितीवर असलेले मच्छीमारांचे प्रतिनिधी करतात तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. मच्छीमारांना नुकसानभरपाई नाकारून मच्छीमारांचे प्रतिनिधीच ओएनजीसीकडून काही सुविधा किंवा भत्ते लाटत असावेत, असाही संशय आता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)