शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ओएनजीसीने भरपाईची माहिती नाकारली

By admin | Updated: October 30, 2015 23:46 IST

समुुद्रातील तेलसंशोधन सर्व्हेमुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना दिलेली नुकसानभरपाई, नुकसानभरपाईसाठी मंजूर झालेले प्रस्ताव

वसई : समुुद्रातील तेलसंशोधन सर्व्हेमुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना दिलेली नुकसानभरपाई, नुकसानभरपाईसाठी मंजूर झालेले प्रस्ताव, ओएनजीसीच्या भूगर्भ समन्वय समितीतील मच्छीमारांच्या प्रतिनिधींना वा त्यांच्या संघटनांना ओएनजीसीकडून देण्यात आलेले लाभ यासह विविध याद्यांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाविरोधात कोळी युवाशक्तीचे दिलीप माठक यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील दाखल केले आहे.केंद्राच्या अखत्यारीतील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अरबी समुद्रात तेलसंशोधन मोहीम राबवत असते. यासाठी परदेशी कंपन्यांना सर्व्हेचे कंत्राट देण्यात येते. सर्व्हे राबवताना मच्छीमारांचा समावेश असलेल्या समन्वय समितीला ओएनजीसी विश्वासात घेते, असे सांगितले जाते. या प्रत्येक सर्व्हेच्या वेळी स्थानिक मच्छीमार बाधित होत असतात. या मच्छीमारांना ओएनजीसीकडून नुकसानभरपाई दिली जात असल्याचा दावाही अनेकदा केला जातो. या पार्श्वभूमीवर वसईच्या पाचूबंदर-किल्लाबंदर येथील कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी ओएनजीसीच्या वांद्रे येथील कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करून सहा मुद्यांवर माहिती मागितली होती. या अर्जावर ओएनजीसीचे केंद्रीय जनमाहिती अधिकारी सोयेश रंजन यांनी माठक यांना पाठवलेल्या पत्रात संबंधित कार्यालयात आपणास हवी असलेली माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही माहिती पुरवू शकत नाही, असे सांगितले. ओएनजीसीच्या मुंबई प्रदेश कार्यालयातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, काही हाती लागले नाही. यामुळे आम्ही उरण येथील कार्यालयातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे उत्तर माठक यांना देण्यात आले. यानंतर माठक यांचा अर्ज ओएनजीसीच्या उरण कार्यालयात रवाना करण्यात आला. मात्र, त्यांनीही हात झटकले. त्यामुळे व्यथित झालेल्या माठक यांनी ओएनजीसीचे नवी दिल्लीतील प्रथम अपीलिय अधिकारी आलोक मिश्रा यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. पहिल्या अपिलावर ४५ दिवसांत सुनावणी घेणे कायद्याने बंधनकारक आहे, असे असूनही मिश्रा यांनी माठक यांच्या अपिलावर सुनावणी घेण्याचेच टाळले. परिणामी, माठक यांनी आता थेट केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांकडेच या प्रकरणी दाद मागितली आहे.अनेक वेळा सर्व्हेमुळे बाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई दिली गेल्याचे दावे केले जातात. तथापि, माठक यांच्या अर्जावर ओएनजीसीने नुकसानभरपाईची माहिती देणे टाळल्यामुळे ओएनजीसीकडून कोणतीही नुकसानभरपाई दिली जात नसल्याचेच यामुळे चित्र निर्माण झालेय. त्यामुळे ओएनजीसीच्या समन्वय समितीवर असलेले मच्छीमारांचे प्रतिनिधी करतात तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. मच्छीमारांना नुकसानभरपाई नाकारून मच्छीमारांचे प्रतिनिधीच ओएनजीसीकडून काही सुविधा किंवा भत्ते लाटत असावेत, असाही संशय आता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)