शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ४९० रुग्ण सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे एक हजार ४९० रुग्ण आढळले असून, ५७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ...

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे एक हजार ४९० रुग्ण आढळले असून, ५७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.

ठाणे शहरात ३०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २६ हजार १८० झाली. शहरात आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ७९८ नोंदवण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत ४८१ रुग्णांची वाढ झाली असून, १८ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख २९ हजार ४११ रुग्ण बाधित असून, एक हजार ६६२ मृत्यूंची नोंंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले. यामुळे येथील बाधितांची संख्या १९ हजार ७१६, तर ४५७ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १२ बाधित असून, तीन मृत्यू आहेत. आता बाधित १० हजार २१२ असून मृतांची संख्या ४१७ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १६५ रुग्ण आढळले असून, नऊ मृत्यू आहेत. यामुळे शहरात बाधितांची संख्या ४७ हजार ६५ झाली असून, मृतांची संख्या एक हजार १८१ वर गेली.

अंबरनाथमध्ये ४७ रुग्ण आढळल्याने आता बाधित १८ हजार ७६८ असून, चार मृत्यू आहेत. येथील मृत्यूंची संख्या ३९६ झाली आहे. बदलापूरमध्ये ८७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २० हजार एक झाले. या शहरात दोन मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या २३० झाली आहे. ग्रामीणमध्ये १९९ रुग्णांची वाढ झाली असून दहा जण दगावले. आता बाधित ३१ हजार ८५८ तर आतापर्यंत ७८९ मृत्यू झाले आहेत.