शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

उल्हासनगरात पठाणी व्याजखोरांचा आतंकाने एकजण बेपत्ता

By सदानंद नाईक | Updated: February 28, 2023 19:08 IST

व्याजाच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनील मोटवानी हे बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून त्याने लिहलेली पठाणी व्याजाची चिट्ठी कुटुंबाने हिललाईन पोलिसांना दिली.

उल्हासनगर - व्याजाच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनील मोटवानी हे बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून त्याने लिहलेली पठाणी व्याजाची चिट्ठी कुटुंबाने हिललाईन पोलिसांना दिली. यापूर्वी पठाणी व्याजातून गिरीश चुग यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून आत्महत्या केली. तर रोहिना अन्सारी यामहिलेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रकार झाला आहे. पठाणी व्याजाच्या व्यवहारावर अंकुश घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याची टिका होत आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात सुनील मोटवानी हे कुटुंबासह राहत असून २२ फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याचा गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाला. सुनील हा पठाणी व्याजातून बेपत्ता झाला असून त्याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मोठा भाऊ प्रेमप्रकाश मोटवानी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराने पठाणी व्याजाची चर्चा शहरात पुन्हा सुरू झाली. दोन महिन्यांपूर्वी गिरीश चुग या इसमाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या केल्याचा प्रकार झाला होता. चुग यांनी पठाणी व्याजखोरावर कारवाई करण्याची मागणी केली होती. घरात एकटाच कमावता असणाऱ्या गिरीश चुग यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई-वडील आहेत. 

दुसऱ्या प्रकारात कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या रोहिना अन्सारी यांनी पठाणी व्याजातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पती घरी येऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेल्याने, जीव वाचला. त्यांनीही पठाणी व्याजखोरांच्या आतंकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने, खळबळ उडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शहरातून झाली होती. सुनील मोटवानी यांनी लिहिलेल्या चिट्टीत काही जणांकडून व्याजाने पैसे घेतल्याचे नमूद आहे. मात्र पठाणी व्याजातून त्रस्त असल्याचे त्यांनी चिट्टीत म्हटले आहे. कुटुंबाने चिट्टी पोलिसांना देऊन सुनील मोटवानी याचा शोध घेण्याची विनंती केली. तसेच भाऊ प्रमेप्रकाश मोटवानी यांनी भावाच्या जीवाला धोका असल्याची भीती पत्रकारां सोबत बोलताना दिली. याबाबत हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या सोबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

पोलीस ठाण्यापर्यंत प्रकार जात नाही? 

पठाणी व्याजाचा विळखा अनेकांच्या गळ्या भोवती पडला असून भीतीपोटी कोणी समोर येत नाही. अथवा पोलीस ठाण्या पर्यंत जाऊ दिले जात नसल्याचे बोलले जाते.