शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

दीड वर्षात दिव्यात ५१ रेल्वे अपघात,४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:50 IST

दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले.

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले. मृतांमध्ये कानात एअरफोन घालून रेल्वे लाइन क्रॉसिंग करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.व्यात स्वस्तात मिळणाºया घरांमुळे आणि दिवा हे जंक्शन असल्याने नागरिकांची पसंती दिव्याला मिळत आहे. त्यामुळे दिव्याचे झपाट्याने नागरीकरण होत, लोकसंख्या वाढत आहे. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोकलशिवाय पर्याय नसल्याने कळत नकळत त्याचा परिणाम लोकलवर होत आहे. यातून दीड वर्षात दिवा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना असे एकूण ५१ रेल्वे अपघात झाले आहेत.२०१७ या वर्षभरात ४० अपघातांची नोंद असून, त्यामध्ये २२ जणांचा मृत झाला आहे. तर १८ जण जखमी झाले होते. तसेच २०१८ मध्ये जानेवारी ते जूनमध्ये ११ अपघात झाले आहे. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे.दिवा रेल्वे स्थानकात उतरलेले प्रवासी जाण्यासाठी पाद्चारी पूल असताना, त्याचा वापर न करता आपला जीव धोक्यात घालून रेल्वे लाईन क्रॉस करतात. एखादी लोकल आल्यानंतर जणू लोंढाच्या लोंढा रेल्वे रुळ ओलांडतात. त्यातील बहुसंख्य प्रवासी कानात इअर फोन लावून असतात.त्यातून क्रॉसिंग करताना, अपघात होण्याची शक्यता असून, ती एक चिंतेची बाब असल्याचे रेल्वे सूत्रांने सांगितले.