शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

दीड टन भातबियाणे, खतवाटप; बळीराजासाठी मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:46 IST

चरगाव येथे झाला कार्यक्रम

बदलापूर : लॉकडाउनच्या काळात बळीराजाला गावात येऊन बियाणे व खत घेण्यात अडचणी निर्माण होतील. ही अडचण लक्षात घेऊन सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खतवाटप हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत अंबरनाथ तालुक्यातील कृषी विभागाने आतापर्यंत दीड टन भाताचे बियाणे तर चार टन खताचे वाटप गावागावांत जाऊन केले आहे. येत्या आठवड्यात तूरडाळीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात डाळ आणि भाताचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने भात आणि डाळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्याचा बळीराजाचा प्रयत्न आहे.

चरगाव येथे बियाणे व खतवाटप कार्यक्रम झाला. तालुका कृषी अधिकारी सुवर्णा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच बेबीताई कडाळी, शेतकरी गटप्रमुख प्रकाश कडाळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश पडते, कृषी सहायक सचिन तोरवे, अमर वरकडे आदी उपस्थित होते.लॉकडाउनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या गरजूंच्या दारात ज्या तत्परतेने जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात आल्या, त्याच पद्धतीने कृषी विभागाच्या वतीने सध्या शेतकऱ्यांच्या घराजवळ आवश्यक बियाणे आणि खत पोहोचवले जात आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. त्यामुळे मागणीनुसार भातबियाणांच्या विविध जाती आणि खत वितरण सुरू झाले आहे. यंदा भात बियाण्यांबरोबरच तुरीचे बीजही शेतकºयांना दिले जात आहे.

सध्या अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन कृषी कर्मचारी शेतकºयांच्या मागणीनुसार बियाणे आणि खत देत आहेत. शेतकºयांच्या मागणीनुसार गावानुसार याद्या करून टेम्पोमधून बियाणे थेट त्यांच्या गावात दिले जात आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने ५० टक्के अनुदानात कर्जत-७, कर्जत-२, जया आणि रत्ना या जातीचे भातबियाणे शेतकºयांना दिले जाणार आहे.

बाजारात गेलो असतो तर भाडे व वेळ गेला असता. मात्र, गावात बियाणे व खत मिळाल्याने, तेही स्वस्त आणि योग्य दर्जाचे मिळाल्याने समाधान वाटत आहे.- प्रकाश कडाळी, शेतकरी गटप्रमुख

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे