शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रखडलेल्या प्रकल्पांसाठी ठामपाला शासनाकडून हवेत दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST

ठाणे : कोरोनाकाळात ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने शहरात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांसह महत्त्वाच्या कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची ...

ठाणे : कोरोनाकाळात ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने शहरात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांसह महत्त्वाच्या कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दीड हजार कोटींची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने तसेच ठाण्यात महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री असल्याने हा निधी मिळेल, असा विश्वास ठाण्यातील लोकप्रतिनिधींना आहे.

आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या कामांची किंवा नव्या प्रकल्पांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा वास्तववादी असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच तो तब्बल एक हजार ३०० कोटींचा तुटीचा सादर केला होता. स्थायी समितीमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असली तरी निधीच्या अभावी यामध्ये केवळ ४९१ कोटींचीच वाढ केली आहे. अर्थसंकल्पाच्या तुटीच्या रक्कमेबाबत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रकल्प रखडू नये यासाठी तेदेखील सकारात्मक असल्याचे भोईर यांनी सांगितले. कोरोनामुळे वर्षभर जी कामे होऊ शकली नाही तसेच चौपाट्या, रस्ते विकास, तलाव संवर्धन, अशी कामे करावीच लागणार असून, यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पावर चर्चा करताना स्थायी समितीमध्ये नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी शाई धरणासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची मागणी केली. जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न, केंद्र आणि राज्याच्या अनुदानाचा पाठपुरावा केला असता तर यामधून ४०० ते ५०० कोटींचे उत्पन्न, विकास आराखड्यामध्ये रस्ते विकासचा अंतर्भाव करण्याबरोबरच कोविडमध्ये निधीची असलेली गरज आणि प्रत्यक्षात झालेला खर्च याचा खुलासा करण्यासोबतच महासभेत झालेले ठराव तसेच किती ठरावांची अंमलबजावणी झाली याचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. कृष्णा पाटील यांनीदेखील उत्पन्नवाढीसाठी पार्किंग पॉलिसी राबविण्याची सूचना केली. तसेच ३० टक्के नागरिकांना पाण्याची बिले मिळत नसून त्यामुळे उत्पन्नात घट होत असल्याचे त्यांनी लक्ष वेधले. फेरीवाल्यांकडून टॅक्स घेण्यासोबतच महापालिका मुख्यालयासाठी निधीची तरतुदीची मागणी त्यांनी केली. तर विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मुलींचे वसतिगृह बांधण्याची मागणी केली. तसेच अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी नागरी सुविधांचा निधी देण्यापेक्षा अधिकृत बंधकांच्या ठिकाणी जास्त नागरी सुविधा निधी देण्याची मागणी केली.

ठाणे परिवहन हे ठाणे महापालिकेचे अविभाज्य अंग असून, परिवहनला जर सक्षम करायचे असेल तर तिचे ठाणे महापालिकेत विलीनीकरण करावे अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.

मॉल, मल्टिप्लेक्समधील दुकानांना कर लागणार

सर्वसामान्य ठाणेकर प्रामाणिकपणे कर भरतो. मात्र मल्टिप्लेक्स आणि मॉलमध्ये मोकळ्या जागेत अनेक दुकाने थाटली असून, याचा फायदा केवळ मॉलच्या मालकांना होतो. त्यामुळे महापालिकेचेदेखील नुकसान होत असून, त्यामुळे या सर्व दुकानांना मालमत्ताकर लावण्याची मागणी यावेळी स्थायी समिती सदस्यांनी केली.