शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रखडलेल्या प्रकल्पांसाठी ठामपाला शासनाकडून हवेत दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST

ठाणे : कोरोनाकाळात ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने शहरात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांसह महत्त्वाच्या कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची ...

ठाणे : कोरोनाकाळात ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याने शहरात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांसह महत्त्वाच्या कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दीड हजार कोटींची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने तसेच ठाण्यात महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री असल्याने हा निधी मिळेल, असा विश्वास ठाण्यातील लोकप्रतिनिधींना आहे.

आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या कामांची किंवा नव्या प्रकल्पांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा वास्तववादी असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच तो तब्बल एक हजार ३०० कोटींचा तुटीचा सादर केला होता. स्थायी समितीमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असली तरी निधीच्या अभावी यामध्ये केवळ ४९१ कोटींचीच वाढ केली आहे. अर्थसंकल्पाच्या तुटीच्या रक्कमेबाबत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रकल्प रखडू नये यासाठी तेदेखील सकारात्मक असल्याचे भोईर यांनी सांगितले. कोरोनामुळे वर्षभर जी कामे होऊ शकली नाही तसेच चौपाट्या, रस्ते विकास, तलाव संवर्धन, अशी कामे करावीच लागणार असून, यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पावर चर्चा करताना स्थायी समितीमध्ये नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी शाई धरणासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची मागणी केली. जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न, केंद्र आणि राज्याच्या अनुदानाचा पाठपुरावा केला असता तर यामधून ४०० ते ५०० कोटींचे उत्पन्न, विकास आराखड्यामध्ये रस्ते विकासचा अंतर्भाव करण्याबरोबरच कोविडमध्ये निधीची असलेली गरज आणि प्रत्यक्षात झालेला खर्च याचा खुलासा करण्यासोबतच महासभेत झालेले ठराव तसेच किती ठरावांची अंमलबजावणी झाली याचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. कृष्णा पाटील यांनीदेखील उत्पन्नवाढीसाठी पार्किंग पॉलिसी राबविण्याची सूचना केली. तसेच ३० टक्के नागरिकांना पाण्याची बिले मिळत नसून त्यामुळे उत्पन्नात घट होत असल्याचे त्यांनी लक्ष वेधले. फेरीवाल्यांकडून टॅक्स घेण्यासोबतच महापालिका मुख्यालयासाठी निधीची तरतुदीची मागणी त्यांनी केली. तर विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मुलींचे वसतिगृह बांधण्याची मागणी केली. तसेच अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी नागरी सुविधांचा निधी देण्यापेक्षा अधिकृत बंधकांच्या ठिकाणी जास्त नागरी सुविधा निधी देण्याची मागणी केली.

ठाणे परिवहन हे ठाणे महापालिकेचे अविभाज्य अंग असून, परिवहनला जर सक्षम करायचे असेल तर तिचे ठाणे महापालिकेत विलीनीकरण करावे अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.

मॉल, मल्टिप्लेक्समधील दुकानांना कर लागणार

सर्वसामान्य ठाणेकर प्रामाणिकपणे कर भरतो. मात्र मल्टिप्लेक्स आणि मॉलमध्ये मोकळ्या जागेत अनेक दुकाने थाटली असून, याचा फायदा केवळ मॉलच्या मालकांना होतो. त्यामुळे महापालिकेचेदेखील नुकसान होत असून, त्यामुळे या सर्व दुकानांना मालमत्ताकर लावण्याची मागणी यावेळी स्थायी समिती सदस्यांनी केली.