शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा जखमी रेल्वे प्रवाशाकडे दुर्लक्ष; रुग्णवाहिकेअभावे उपचारासाठी विलंब

By पंकज पाटील | Updated: April 8, 2023 18:13 IST

दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जखमी अवस्थेत असलेल्या दिव्या जाधव तरुणीला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शुक्रवारी रात्री दहा वाजून 45 मिनिटांनी एका तरुणाचा रेल्वेतून पडून अपघात घडला या तरुणाला तब्बल अर्धा तास उपचाराविना स्थानकात तडफडत ठेवण्यात आले. 

दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जखमी अवस्थेत असलेल्या दिव्या जाधव तरुणीला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतून रेल्वे प्रशासनाने कोणताही बोध घेतलेला नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी रात्री अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलमधून पडलेला मसीहा जोसफ (१९) हा तरुण जखमी अवस्थेत तडफडत होता. त्या तरुणाला उचलून रेल्वे स्थानकात आणण्यासाठी देखील रेल्वे प्रशासनाने बराच विलंब लावला. उपचारासाठी तडपणाऱ्या या तरुणाला रेल्वे आणि पोलिसांच्या पंचनाम्याला सामोरे जावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या या कामाच्या प्रवृत्तीमुळे रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर १०८ रुग्णवाहिका तैनात केली होती. काही दिवस १०८ रुग्णवाहिकाही अंबरनाथ स्थानकाबाहेर दिसली. मात्र त्यानंतर रुग्णवाहिकेची सेवा बंद झाली असून वन रुपी क्लिनिकही बंद झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी जखमींची मोठी फरपट होताना दिसत आहे. शुक्रवारी ज्या तरुणाचा रेल्वे अपघात घडला त्यासंदर्भात स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी रेल्वे प्रशासनाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे प्रशासनाने आमदारांच्या कॉलला देखील कोणताही प्रतिसाद दिला नाही. याबाबत खुद्द आमदार कीणीकर यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलीये. दरम्यान रेल्वेच्या नोंदवहीमध्ये हा अपघात 10:46 मिनिटांनी घडला असून ११.१५ मिनिटांनी म्हणजे तब्बल अर्धा तासानंतर रुग्णवाहिका आल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.

 

टॅग्स :ambernathअंबरनाथ