शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पोलिसांच्या दक्षतेमुळे वृद्ध आईची झाली मुलाशी पुनर्भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:42 IST

जुजबी माहितीच्या आधारे केलेले प्रयत्न यशस्वी : स्मृतिभ्रंश झाल्यामुळे पत्ता आणि फोन नंबरही सांगता येत नव्हते

जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लुईसवाडी भागात कुसुम मधुकर ससाणे या ६० वर्षीय वृद्धेला स्मृतिभ्रंश झाल्यामुळे तिला पत्ता किंवा नातेवाइकांचे फोन क्रमांकही सांगता येत नव्हते. केवळ कुर्ला-मुंबईत राहते, इतकीच जुजबी माहिती तिने दिल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी तिची आणि कल्याण इथे राहणारा तिचा मुलगा सचिन ससाणे यांची नुकतीच पुनर्भेट घडवून आणली. आपली आई पुन्हा मिळाल्याने सचिन यांना भावना अनावर झाल्या होत्या.

वागळे इस्टेट, लुईसवाडी भागात कुसुम ही वृद्ध महिला ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विमनस्क अवस्थेमध्ये फिरताना आढळली. तिला पत्ता आणि नातेवाइकांचे फोन क्रमांकही सांगता येत नव्हते. ती केवळ कुर्ला येथे राहते इतकीच जुजबी माहिती सांगत होती. याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव, संजय आगवणे, राकेश घोसाळकर आणि सुनीता गीते आदींच्या पथकाने ठाणे तसेच कुर्ला आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यांना तिची माहिती दिली. परंतु, कोणतीच माहिती उपलब्ध होत नव्हती.

१० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पुन्हा तिला विश्वासात घेऊन तिच्या नातेवाइकांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने सासू गजराबाई ही कुर्ला मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करते, असे सांगितले. या माहितीच्या आधारे कुर्ला मार्केटमधील बीट अंमलदाराशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पती घाटकोपर येथे महानगरपालिकेत कामाला असल्याचेही तिने सांगितले. या माहितीच्या आधारे नाशिक, मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे येथील पाटबंधारे विभागातही या पथकाने चौकशी केली. त्यानंतर तिचे पती मधुकर ससाणे मुंबई महापालिकेच्या पाणीखात्यात नोकरीला होते. त्यांचे निधन झाल्याची माहिती घाटकोपर येथील पाणीपुरवठा विभागातील एका महिलेने दिली. त्यावरून तिचा मुलगा सचिन ससाणे याचा मोबाइल क्रमांक मिळवून पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि मायलेकाची भेट घडवून आणली.पोलिसांनी महिलेचा मुलगा सचिनकडे सविस्तर चौकशी केली असता, त्याची आई असून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून घरात काहीएक न सांगता निघून गेल्याचे उघडकीस आले.

आपण कल्याण येथे वास्तव्याला असून२०१७ पासून आईची मानसिक स्थिती ठीक नाही. तिच्यावर एका खासगी रु ग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचेही सचिनने सांगितले.कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये शोध घेऊनही ती मिळाली नव्हती. पोलिसांनी पुन्हा भेट घडवून आणल्यामुळे सचिनने आभार मानले.