शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जुनी अर्धवट; तरी नव्याची तयारी

By admin | Updated: February 8, 2017 04:03 IST

अंबरनाथमधील ७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असतानाच नव्या योजनेच्या कामाची तयारी करण्यात येत आहे. ७८ कोटींचा खर्च करुनही

पंकज पाटील , अंबरनाथअंबरनाथमधील ७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असतानाच नव्या योजनेच्या कामाची तयारी करण्यात येत आहे. ७८ कोटींचा खर्च करुनही विस्तारित पाणीपुरवठा योजना योग्यप्रकारे कार्यान्वीत झालेली नाही. कोहोजगाव येथे उभारलेल्या जलकुंभात दोन वर्षात एक थेंबही पाणी आलेले नाही. जुन्या योजनेचे काम अर्धवट असताना प्राधिकरण नव्या योजनेचे काम करण्याच्या तयारीत आहे. अंबरनाथच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य सरकारने ७८ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेची जबाबदारी ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर सोपविण्यात आली. शहरात सर्व पाणीपुरवठा प्राधिकरणामार्फत होत असल्याने या योजनेचे काम पूर्ण करुन घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. निविदा प्रक्रिया झाल्यावर ठराविक वेळेत हे काम पूर्ण करुन शहरातील वितरण व्यवस्था सुधारेल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र कामाची मुदत संपून वर्ष उलटले तरी या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे कामही अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आले आहे. कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरण यांच्यात ताळमेळ नसल्याने कंत्राटदारही सर्व कामे करण्यास विलंब लावत आहे. प्रस्तावित पाण्याच्या टाकींचे काम करुन त्यातून पाणीपुरवठा योजना सुरू करणे अपेक्षित होते. मात्र अनेक ठिकाणच्या टाकीचे कामच पूर्ण झालेले नाही. तर ज्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे त्या टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच टाकलेली नाही. याचा प्रत्यय दोन वर्षापासून कोहोजगांव आणि चिंचपाडा परिसरातील नागरिकांना येत आहे. या परिसरात उभारण्यात आलेल्या टाकीचे काम हे रडतखडत पूर्ण करण्यात आले. गणेशनगर टेकडीवरुन येणारी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी काँक्रीट रस्त्यांची अडचण येत आहे. काँक्रीटचे रस्ते करण्या आधीच जीवन प्राधिकरणाला या परिसरातील जलवाहिन्या टाकून ठेवण्याचे निर्देश पालिकेने दिले होते. मात्र वेळीच जलवाहिन्या न टाकल्याने आता काँक्रिटीकरणाचे काम झाल्यावर ते खोदण्याची परवानगी मागण्यात येत आहे. मात्र काँक्रिटीकरण खोदल्यावर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची असल्याने त्यासाठी वाढीव निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरीच मिळत नसल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले आहे. कोहोजगाव ग्रामस्थ आणि परिसरतील वाढत्या नागरीकरणाला पाणीपुरवठा करण्यासाठी ही टाकी बांधली आहे. या भागात नियमित पाण्याची समस्या भेडसावते. आठवड्यातून तीन ते चार दिवसच पाणी पुरवठा होतो. टाकीचे आणि जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याची मागणी तीन वर्षापासून नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील, अर्चना चरण रसाळ करत आहेत.