शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

तेलाला पुन्हा महागाईचा तडका, नारळ, पालेभाज्यांचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:43 IST

उन्हाळी पावट्याने खाल्ला भाव; द्राक्ष महाग, बीट स्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  दिवाळीपासून तेलाच्या दरांत वाढ होत आहे. तेलाला अद्याप महागाईचा तडका आहे तर ओल्या नारळाने अर्धेशतक गाठले आहे. पालेभाज्या महागल्या असून उन्हाळी पावट्याने दरांत उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे बीट, टोमॅटो स्वस्त झाले आहेत. द्राक्षे अद्याप महाग असली तरी स्ट्रॉबेरी मात्र स्वस्त झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

       गेल्या काही दिवसांत भाज्या प्रचंड स्वस्त झाल्या होत्या. आता दरांत हळूहळू वाढ होत चालली आहे. उन्हाळी पावटा, गवार, शेवग्याच्या शेंगा, राजमा या भाज्या महागल्या आहेत. पालेभाज्यांमध्येही वाढ झाली आहे.       या उलट बीट, टोमॅटो, मका स्वस्त झाले आहेत, असे भाजी विक्रेते अमोल जगताप यांनी सांगितले. पेर, सफरचंद महाग झाले आहेत, असे फळविक्रेते शशिभूषण पाठक यांनी सांगितले. 

      तेलाच्या दरांत वाढ होत चालली आहे. या आठवड्यातही तेल महाग आहे, तर नारळ पन्नाशीवर असल्याचे किराणा विक्रेते दीपक जाधव यांनी सांगितले. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान नारळ मालवण, मैसूर, कलिकत, मद्रास या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत, असे जाधव पुढे म्हणाले. 

सफरचंद होलसेलला १२०-१२४ रु. किलो, किरकोळमध्ये १४० रु. किलोने आहेत. याआधी सफरचंद १०० रु. किलो होते. पेर होलसेलला १८०० रुपये १२ किलो, तर किरकोळमध्ये १८० रु. किलो, द्राक्ष होलसेलमध्ये ११०० रु. १० किलो, तर १४०-१५० रु. किरकोळमध्ये आहे.

तेल होलसेलमध्ये ११० ते १४९ रु. लीटर, किरकोळला १२० ते १६० रु. लीटर आहे. १६० रु. लीटर मिळणारे तेल आधी १३० ते १३५ रु. लीटरने मिळत होते. नारळ होलसेलमध्ये १७ ते ४० रु. तर किरकोळमध्ये २०-५० रु.प्रमाणे मिळत आहे.

मेथी होलसेलमध्ये १२ ते १५ रु, तर किरकोळमध्ये २५ रु. जुडी, शेपू होलसेलमध्ये ८ ते १० रु. तर किरकोळमध्ये १५ रु. जुडी, कोथिंबीर होलसेलला १२ ते १५ रु. तर किरकोळमध्ये २० ते २५ रु. जुडी, चवळी, पालक होलसेलमध्ये ८ ते ९ रु., किरकोळमध्ये १५ रु. जुडी मिळत आहे.

दिवाळीपासून सुके खोबरे आणि तेलाचे दर वाढतच होते. मध्यंतरी एक किलो सुके खोबरे २०० रु. किलो होते. नवीन वर्षात २२० रु. किलो झाले आहे. एक लीटर तेल १२० रु. किलो झाले आहे. तेलापेक्षा सुक्या खोबऱ्यालाच जास्त भाव आला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.              - रेश्मा मोरे, ग्राहक

शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे भाज्यांची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे दर वाढत आहेत.-  अमोल जगताप, भाजीविक्रेता

सफरचंद   पुन्हा महागले आहेत. द्राक्षाची आवक वाढली की त्याचेही दर कमी होतील.-  शशिभूषण   पाठक, फळविक्रेता