शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

तेलाला पुन्हा महागाईचा तडका, नारळ, पालेभाज्यांचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:43 IST

उन्हाळी पावट्याने खाल्ला भाव; द्राक्ष महाग, बीट स्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  दिवाळीपासून तेलाच्या दरांत वाढ होत आहे. तेलाला अद्याप महागाईचा तडका आहे तर ओल्या नारळाने अर्धेशतक गाठले आहे. पालेभाज्या महागल्या असून उन्हाळी पावट्याने दरांत उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे बीट, टोमॅटो स्वस्त झाले आहेत. द्राक्षे अद्याप महाग असली तरी स्ट्रॉबेरी मात्र स्वस्त झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

       गेल्या काही दिवसांत भाज्या प्रचंड स्वस्त झाल्या होत्या. आता दरांत हळूहळू वाढ होत चालली आहे. उन्हाळी पावटा, गवार, शेवग्याच्या शेंगा, राजमा या भाज्या महागल्या आहेत. पालेभाज्यांमध्येही वाढ झाली आहे.       या उलट बीट, टोमॅटो, मका स्वस्त झाले आहेत, असे भाजी विक्रेते अमोल जगताप यांनी सांगितले. पेर, सफरचंद महाग झाले आहेत, असे फळविक्रेते शशिभूषण पाठक यांनी सांगितले. 

      तेलाच्या दरांत वाढ होत चालली आहे. या आठवड्यातही तेल महाग आहे, तर नारळ पन्नाशीवर असल्याचे किराणा विक्रेते दीपक जाधव यांनी सांगितले. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान नारळ मालवण, मैसूर, कलिकत, मद्रास या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत, असे जाधव पुढे म्हणाले. 

सफरचंद होलसेलला १२०-१२४ रु. किलो, किरकोळमध्ये १४० रु. किलोने आहेत. याआधी सफरचंद १०० रु. किलो होते. पेर होलसेलला १८०० रुपये १२ किलो, तर किरकोळमध्ये १८० रु. किलो, द्राक्ष होलसेलमध्ये ११०० रु. १० किलो, तर १४०-१५० रु. किरकोळमध्ये आहे.

तेल होलसेलमध्ये ११० ते १४९ रु. लीटर, किरकोळला १२० ते १६० रु. लीटर आहे. १६० रु. लीटर मिळणारे तेल आधी १३० ते १३५ रु. लीटरने मिळत होते. नारळ होलसेलमध्ये १७ ते ४० रु. तर किरकोळमध्ये २०-५० रु.प्रमाणे मिळत आहे.

मेथी होलसेलमध्ये १२ ते १५ रु, तर किरकोळमध्ये २५ रु. जुडी, शेपू होलसेलमध्ये ८ ते १० रु. तर किरकोळमध्ये १५ रु. जुडी, कोथिंबीर होलसेलला १२ ते १५ रु. तर किरकोळमध्ये २० ते २५ रु. जुडी, चवळी, पालक होलसेलमध्ये ८ ते ९ रु., किरकोळमध्ये १५ रु. जुडी मिळत आहे.

दिवाळीपासून सुके खोबरे आणि तेलाचे दर वाढतच होते. मध्यंतरी एक किलो सुके खोबरे २०० रु. किलो होते. नवीन वर्षात २२० रु. किलो झाले आहे. एक लीटर तेल १२० रु. किलो झाले आहे. तेलापेक्षा सुक्या खोबऱ्यालाच जास्त भाव आला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.              - रेश्मा मोरे, ग्राहक

शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे भाज्यांची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे दर वाढत आहेत.-  अमोल जगताप, भाजीविक्रेता

सफरचंद   पुन्हा महागले आहेत. द्राक्षाची आवक वाढली की त्याचेही दर कमी होतील.-  शशिभूषण   पाठक, फळविक्रेता