शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:42 IST

आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली.

- पंकज पाटीलअंबरनाथ : आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली. प्राधिकरणाकडून होणाºया चुकांची चर्चा करण्यात आली. तसेच या कामचुकार अधिकाऱ्यांची कथोरे यांनी हजेरी घेत सर्व अधिकाºयांना नियोजनबद्ध काम करण्याची ताकीद दिली. या पुढे त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती झाल्यास ही योजना हस्तांतर करण्याचा विचार केला जाईल, असे कथोरे यांनी बजावले.‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मथळ््याखालील बातमीनंतर कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व अधिकाºयांना बैठकीकरिता बोलावून घेतले. जीवन प्राधिकरण पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींना पाटबंधारे विभागालाही जबाबदार धरत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी ५० दशलक्ष लीटर्स पाणी उपलब्ध झालेले असले तरी त्याचे वितरण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत योजनेच्या दुसºया टप्प्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी योजनेच्या कामानंतरही जीवन प्राधिकरण पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याचे नियोजन करतांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र ते करीत असतांना त्याचा त्रास हा नागरिकांना होत आहे. एक दिवस वितरण व्यवस्था बंद राहिल्यावर त्याचा फटका हा पुढे दोन दिवस सहन करावा लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतूने आमदार कथोरे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे या देखील हजर होत्या. कथोरे यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच अमृत योजनेतून सुरू असलेल्या कामांबाबत कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेचे काम करताना मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. अंबरनाथबाबत ठेकेदार कामचुकारपणा करीत असल्याची बाब कथोरे यांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. कामाला विलंब करणाºया ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले. काम करताना अस्तित्वातील लोकवस्तीचा विचार न करता भविष्यात निर्माण होणारी लोकवस्तीचा विचार करून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पालंडे यांनी पाणीगळतीचे प्रमाण ही डोकेदुखी असल्याचे स्पष्ट केले. तब्बल ३७ टक्के पाणीगळती असल्याने पाणी तुटवडा त्यामुळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन योजना झाल्यावर ही गळती कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्या वाहिन्या सुरूच राहिल्याने गळतीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. १० ते १५ दशलक्ष लीटर्स पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, जीवन प्राधिकरण १०० दशलक्ष लीटर्स पाणी उचलत असेल आणि त्यातील ४० दशलक्ष लीटर्स पाणी वाया जात असेल तर ही मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले.लहान धरणे बांधण्याची गरजठाणे जिल्ह्यात पाणी नाही, अशी ओरड सर्वच नेते करीत असतात. मात्र, ते पाणी आणण्यासाठी लहान लहान धरणे बांधण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाहीत. तालुक्यात आणि जिल्ह्यात लहान धरणे उभारणे ही काळाची गरज आहे. मोठी धरणे उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लहान धरणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा विचार करताना पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.