शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:42 IST

आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली.

- पंकज पाटीलअंबरनाथ : आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली. प्राधिकरणाकडून होणाºया चुकांची चर्चा करण्यात आली. तसेच या कामचुकार अधिकाऱ्यांची कथोरे यांनी हजेरी घेत सर्व अधिकाºयांना नियोजनबद्ध काम करण्याची ताकीद दिली. या पुढे त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती झाल्यास ही योजना हस्तांतर करण्याचा विचार केला जाईल, असे कथोरे यांनी बजावले.‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मथळ््याखालील बातमीनंतर कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व अधिकाºयांना बैठकीकरिता बोलावून घेतले. जीवन प्राधिकरण पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींना पाटबंधारे विभागालाही जबाबदार धरत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी ५० दशलक्ष लीटर्स पाणी उपलब्ध झालेले असले तरी त्याचे वितरण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत योजनेच्या दुसºया टप्प्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी योजनेच्या कामानंतरही जीवन प्राधिकरण पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याचे नियोजन करतांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र ते करीत असतांना त्याचा त्रास हा नागरिकांना होत आहे. एक दिवस वितरण व्यवस्था बंद राहिल्यावर त्याचा फटका हा पुढे दोन दिवस सहन करावा लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतूने आमदार कथोरे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे या देखील हजर होत्या. कथोरे यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच अमृत योजनेतून सुरू असलेल्या कामांबाबत कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेचे काम करताना मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. अंबरनाथबाबत ठेकेदार कामचुकारपणा करीत असल्याची बाब कथोरे यांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. कामाला विलंब करणाºया ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले. काम करताना अस्तित्वातील लोकवस्तीचा विचार न करता भविष्यात निर्माण होणारी लोकवस्तीचा विचार करून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पालंडे यांनी पाणीगळतीचे प्रमाण ही डोकेदुखी असल्याचे स्पष्ट केले. तब्बल ३७ टक्के पाणीगळती असल्याने पाणी तुटवडा त्यामुळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन योजना झाल्यावर ही गळती कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्या वाहिन्या सुरूच राहिल्याने गळतीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. १० ते १५ दशलक्ष लीटर्स पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, जीवन प्राधिकरण १०० दशलक्ष लीटर्स पाणी उचलत असेल आणि त्यातील ४० दशलक्ष लीटर्स पाणी वाया जात असेल तर ही मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले.लहान धरणे बांधण्याची गरजठाणे जिल्ह्यात पाणी नाही, अशी ओरड सर्वच नेते करीत असतात. मात्र, ते पाणी आणण्यासाठी लहान लहान धरणे बांधण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाहीत. तालुक्यात आणि जिल्ह्यात लहान धरणे उभारणे ही काळाची गरज आहे. मोठी धरणे उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लहान धरणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा विचार करताना पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.