शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:42 IST

आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली.

- पंकज पाटीलअंबरनाथ : आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली. प्राधिकरणाकडून होणाºया चुकांची चर्चा करण्यात आली. तसेच या कामचुकार अधिकाऱ्यांची कथोरे यांनी हजेरी घेत सर्व अधिकाºयांना नियोजनबद्ध काम करण्याची ताकीद दिली. या पुढे त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती झाल्यास ही योजना हस्तांतर करण्याचा विचार केला जाईल, असे कथोरे यांनी बजावले.‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मथळ््याखालील बातमीनंतर कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व अधिकाºयांना बैठकीकरिता बोलावून घेतले. जीवन प्राधिकरण पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींना पाटबंधारे विभागालाही जबाबदार धरत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी ५० दशलक्ष लीटर्स पाणी उपलब्ध झालेले असले तरी त्याचे वितरण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत योजनेच्या दुसºया टप्प्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी योजनेच्या कामानंतरही जीवन प्राधिकरण पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याचे नियोजन करतांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र ते करीत असतांना त्याचा त्रास हा नागरिकांना होत आहे. एक दिवस वितरण व्यवस्था बंद राहिल्यावर त्याचा फटका हा पुढे दोन दिवस सहन करावा लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतूने आमदार कथोरे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे या देखील हजर होत्या. कथोरे यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच अमृत योजनेतून सुरू असलेल्या कामांबाबत कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेचे काम करताना मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. अंबरनाथबाबत ठेकेदार कामचुकारपणा करीत असल्याची बाब कथोरे यांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. कामाला विलंब करणाºया ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले. काम करताना अस्तित्वातील लोकवस्तीचा विचार न करता भविष्यात निर्माण होणारी लोकवस्तीचा विचार करून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पालंडे यांनी पाणीगळतीचे प्रमाण ही डोकेदुखी असल्याचे स्पष्ट केले. तब्बल ३७ टक्के पाणीगळती असल्याने पाणी तुटवडा त्यामुळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन योजना झाल्यावर ही गळती कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्या वाहिन्या सुरूच राहिल्याने गळतीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. १० ते १५ दशलक्ष लीटर्स पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, जीवन प्राधिकरण १०० दशलक्ष लीटर्स पाणी उचलत असेल आणि त्यातील ४० दशलक्ष लीटर्स पाणी वाया जात असेल तर ही मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले.लहान धरणे बांधण्याची गरजठाणे जिल्ह्यात पाणी नाही, अशी ओरड सर्वच नेते करीत असतात. मात्र, ते पाणी आणण्यासाठी लहान लहान धरणे बांधण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाहीत. तालुक्यात आणि जिल्ह्यात लहान धरणे उभारणे ही काळाची गरज आहे. मोठी धरणे उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लहान धरणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा विचार करताना पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.