शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयाला लागली वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

पंकज पाटील अंबरनाथ : नगरपालिकेची प्रशासकीय इमारत डबघाईला आलेली असतानाच आता या इमारतीला आणखीन एका महत्त्वाच्या समस्येने वेढले आहे. ...

पंकज पाटील

अंबरनाथ : नगरपालिकेची प्रशासकीय इमारत डबघाईला आलेली असतानाच आता या इमारतीला आणखीन एका महत्त्वाच्या समस्येने वेढले आहे. संपूर्ण पालिकेच्या इमारतीला वाळवी लागली असून, या वाळवीमुळे संपूर्ण कार्यालयातील महत्त्वाच्या फाइल्स खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची इमारत १९७८ला तयार करण्यात आली असून, ही इमारत आता धोकादायक स्थितीत आहे. पालिकेच्या वतीने नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असले तरी अद्याप ते काम पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकेला जुन्या इमारतीतूनच कामकाज करावे लागत आहे. मात्र जुन्या इमारतीमध्येदेखील आता नवनवीन समस्या उद‌्भवत आहेत. आता संपूर्ण पालिकेच्या कार्यालयाला वाळवी लागली असून, या वाळवीमुळे महत्त्वाच्या फाइल्सदेखील खराब झाल्या आहेत. अंबरनाथ नगरपरिषद येथील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात वाळवीचा सर्वाधिक प्रभाव असून, या वाळवीने कार्यालयातील निम्म्याहून अधिक फाइल्स नष्ट केल्या आहेत.

महत्त्वाच्या फाइल्स वाळवीच्या विळख्यात सापडल्याने त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीदेखील चिंतित आहेत.

जन्म-मृत्यू नोंदणीसोबतच पालिकेतील बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, एवढेच नव्हे तर मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयालादेखील वाळवी लागली आहे. तळ मजल्यावरील सर्व कार्यालयांना आणि तेथील अनेक फाइल्स, कागदपत्रांनाही वाळवी लागली आहे. हीच परिस्थिती पहिल्या मजल्यावरील आस्थापना विभाग, अकाउंट विभाग आणि नगरविकास विभागाच्या कार्यालयातदेखील दिसते आहे.

वाळवीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ज्या अधिकाऱ्यांवर शहर विकासाची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयातील वाळवीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येत्या काही दिवसात वाळवीवर नियंत्रण मिळवता न आल्यास पालिकेतील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता आहे.