शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आर्चीच्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:28 IST

आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती.

बदलापूर : शहरात पहिल्यांदाच भरवलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने लावलेल्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सादर झालेल्या विविध नृत्याविष्कारांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.बदलापुरातील क्रीडासंकुलात शुक्रवारपासून तीन दिवसांचा आगरी महोत्सव भरवण्यात आला आहे. आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हात्रे, संयोजक वामन म्हात्रे, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांच्या पुढाकाराने या महोत्सव भरवण्यात आला आहे.शुक्रवारी उद्घाटनाच्या दिवशी सात हजार प्रेक्षक उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या ‘शिट्टी वाजली’ या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपले नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दीपाली सय्यद, केतकी पालव, मीरा जोशी, ऋतुजा शिंदे, सुकन्या काळण, संस्कृती बालगुडे या एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर करत बदलापूरकरांनाही ठेका नाचण्यास भाग पाडले. कार्यक्रमस्थळी झालेली गर्दी ही आयोजकांनी अपेक्षित केलेल्या गर्दीपेक्षा जास्त होती. आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी हा महोत्सव असल्याने प्रत्येकाने आपल्या कुटंबासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.भव्य कला मंच, आकर्षक रोषणाई, कार्यकर्त्यांचा मोठा ताफा, शिस्तबद्ध नियोजन या सर्व बाबतीत कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते ‘सैराट’ या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरूची उपस्थिती. आर्ची हिचा स्टेजवरील प्रवेश हा देखील अनोखाहोता.चंद्राच्या कोरावर बसून आकाशातून क्रेनच्या साहाय्याने तिला स्टेजवर आणण्यात आले. एवढेच नव्हे तर सैराट चित्रपटातील तिचा आवडता डायलॉगही या वेळी तिने सादर केला. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, कार्यक्रमात व्यत्यय होणार नाही, याची आणि आर्चीला त्रास होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घेतल्याने सामान्य प्रेक्षकांना तिला भेटता आले नाही.आगरी संस्कृतीचे दर्शनया कार्यक्रमाच्या निमित्ताने आगरी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा देखावा या वेळी तयार करण्यात आला होता. तसेच प्रवेशद्वारही जेजुरीच्या गडावरील प्रवेशद्वाराप्रमाणे तयार करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाची भव्यता वाढली होती. लहान मुलांच्या आकर्षणासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड या भागांतील आगरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच आगरी महोत्सव भरवला असला तरी नियोजनात मात्र कुठेच कमतरता भासली नाही.

टॅग्स :Rinku Rajguruरिंकू राजगुरू