शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आर्चीच्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:28 IST

आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती.

बदलापूर : शहरात पहिल्यांदाच भरवलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने लावलेल्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सादर झालेल्या विविध नृत्याविष्कारांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.बदलापुरातील क्रीडासंकुलात शुक्रवारपासून तीन दिवसांचा आगरी महोत्सव भरवण्यात आला आहे. आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हात्रे, संयोजक वामन म्हात्रे, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांच्या पुढाकाराने या महोत्सव भरवण्यात आला आहे.शुक्रवारी उद्घाटनाच्या दिवशी सात हजार प्रेक्षक उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या ‘शिट्टी वाजली’ या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपले नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दीपाली सय्यद, केतकी पालव, मीरा जोशी, ऋतुजा शिंदे, सुकन्या काळण, संस्कृती बालगुडे या एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर करत बदलापूरकरांनाही ठेका नाचण्यास भाग पाडले. कार्यक्रमस्थळी झालेली गर्दी ही आयोजकांनी अपेक्षित केलेल्या गर्दीपेक्षा जास्त होती. आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी हा महोत्सव असल्याने प्रत्येकाने आपल्या कुटंबासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.भव्य कला मंच, आकर्षक रोषणाई, कार्यकर्त्यांचा मोठा ताफा, शिस्तबद्ध नियोजन या सर्व बाबतीत कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते ‘सैराट’ या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरूची उपस्थिती. आर्ची हिचा स्टेजवरील प्रवेश हा देखील अनोखाहोता.चंद्राच्या कोरावर बसून आकाशातून क्रेनच्या साहाय्याने तिला स्टेजवर आणण्यात आले. एवढेच नव्हे तर सैराट चित्रपटातील तिचा आवडता डायलॉगही या वेळी तिने सादर केला. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, कार्यक्रमात व्यत्यय होणार नाही, याची आणि आर्चीला त्रास होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घेतल्याने सामान्य प्रेक्षकांना तिला भेटता आले नाही.आगरी संस्कृतीचे दर्शनया कार्यक्रमाच्या निमित्ताने आगरी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा देखावा या वेळी तयार करण्यात आला होता. तसेच प्रवेशद्वारही जेजुरीच्या गडावरील प्रवेशद्वाराप्रमाणे तयार करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाची भव्यता वाढली होती. लहान मुलांच्या आकर्षणासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड या भागांतील आगरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच आगरी महोत्सव भरवला असला तरी नियोजनात मात्र कुठेच कमतरता भासली नाही.

टॅग्स :Rinku Rajguruरिंकू राजगुरू