शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आर्चीच्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:28 IST

आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती.

बदलापूर : शहरात पहिल्यांदाच भरवलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने लावलेल्या उपस्थितीमुळे प्रेक्षक ‘सैराट’ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सादर झालेल्या विविध नृत्याविष्कारांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.बदलापुरातील क्रीडासंकुलात शुक्रवारपासून तीन दिवसांचा आगरी महोत्सव भरवण्यात आला आहे. आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हात्रे, संयोजक वामन म्हात्रे, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांच्या पुढाकाराने या महोत्सव भरवण्यात आला आहे.शुक्रवारी उद्घाटनाच्या दिवशी सात हजार प्रेक्षक उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या ‘शिट्टी वाजली’ या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपले नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दीपाली सय्यद, केतकी पालव, मीरा जोशी, ऋतुजा शिंदे, सुकन्या काळण, संस्कृती बालगुडे या एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर करत बदलापूरकरांनाही ठेका नाचण्यास भाग पाडले. कार्यक्रमस्थळी झालेली गर्दी ही आयोजकांनी अपेक्षित केलेल्या गर्दीपेक्षा जास्त होती. आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी हा महोत्सव असल्याने प्रत्येकाने आपल्या कुटंबासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.भव्य कला मंच, आकर्षक रोषणाई, कार्यकर्त्यांचा मोठा ताफा, शिस्तबद्ध नियोजन या सर्व बाबतीत कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते ‘सैराट’ या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरूची उपस्थिती. आर्ची हिचा स्टेजवरील प्रवेश हा देखील अनोखाहोता.चंद्राच्या कोरावर बसून आकाशातून क्रेनच्या साहाय्याने तिला स्टेजवर आणण्यात आले. एवढेच नव्हे तर सैराट चित्रपटातील तिचा आवडता डायलॉगही या वेळी तिने सादर केला. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. तर, काहींनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, कार्यक्रमात व्यत्यय होणार नाही, याची आणि आर्चीला त्रास होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घेतल्याने सामान्य प्रेक्षकांना तिला भेटता आले नाही.आगरी संस्कृतीचे दर्शनया कार्यक्रमाच्या निमित्ताने आगरी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा देखावा या वेळी तयार करण्यात आला होता. तसेच प्रवेशद्वारही जेजुरीच्या गडावरील प्रवेशद्वाराप्रमाणे तयार करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाची भव्यता वाढली होती. लहान मुलांच्या आकर्षणासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड या भागांतील आगरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच आगरी महोत्सव भरवला असला तरी नियोजनात मात्र कुठेच कमतरता भासली नाही.

टॅग्स :Rinku Rajguruरिंकू राजगुरू