शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्ह्यातील ८२१ क्षयरुग्णांचा पोषण भत्ता लटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जगामध्ये सध्या साधारणतः एक कोटी क्षयरुग्ण असून, त्यापैकी साधारणतः २७ लाख क्षयरुग्ण भारतात आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जगामध्ये सध्या साधारणतः एक कोटी क्षयरुग्ण असून, त्यापैकी साधारणतः २७ लाख क्षयरुग्ण भारतात आहेत. जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये शासकीय संस्थांतर्गत दोन हजार १९८ व खासगी आरोग्य संस्थांतर्गत ८३ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात तब्बल दोन हजार २८१ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एक हजार ४६२ जणांना दरमहा ५०० रुपये भत्ता मिळत आहे, तर अन्य रुग्णांचे बँकेत खाते नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२२ जणांचा पोषण भत्ता लटकला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक क्षयरुग्णांची सीबीनॅट अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली जाते. त्याप्रमाणेच औषधाला दाद न देणारा क्षयरोग याप्रमाणे वर्गीकरण करून जिल्ह्यातील रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांचे एचआयव्ही व रक्तशर्करा प्रमाण यांची तपासणी करून एचआयव्ही बाधित क्षयरुग्णांना टीबीबरोबरच एआरटीचे औषधोपचार केले जात आहे. या रुग्णांच्या सहवासितांची तपासणी करून त्यांना क्षयरोगांची लक्षणे आहेत का? यांची पडताळणी करून क्षयरोग असेल तर क्षयरोगाचे औषधोपचार करण्यात येत आहे.

शासकीय अथवा खासगी क्षेत्रामध्ये औषधोपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना औषधोपचार कालावधीकरिता पोषण आहारासाठी ५०० रुपये दरमहा त्यांच्या बँक खात्यामध्ये पोषण योजनेंतर्गत जमा केले आहेत. रुग्णांना औषधोपचार पूर्ण करण्यासाठी उपचार सहाय्यक म्हणून ट्रीटमेंन्ट सर्पोटर आवश्यकता असल्यास मार्गदर्शक सूचनेनुसार एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. क्षयरुग्ण शोधले व त्यांची माहिती शासकीय यंत्रणेला कळविली तर माहिती देणाऱ्या व्यक्तीला प्रतिरुग्ण ५०० रुपयेप्रमाणे इन्फार्मंट इन्सेंटिव्ह दिला जातो. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात दोन हजार १९८ व खासगी ८३ रुग्ण असे एकूण दोन हजार २८१ रुग्ण असून, एक हजार ४६२ रुग्णांना (६२ टक्के) डीबीटीचा लाभ देण्यात आला आहे. इतर रुग्णांना डीबीटी देणेची प्रक्रिया सुरू आहे. जुलैअखेर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात (एनटीईपी) ठाणे जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये ५ वा क्रमांक आहे.

टीबी नोटिफिकेशन १८ मार्च २०१८ मध्ये भारत सरकारने खासगी क्षेत्रामध्ये निदान होणाऱ्या रुग्णांची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेस देणे बंधनकारक केले आहे. अशा आशयाचे पत्रही राजपत्रात जाहीर केले आहे. यामध्ये या रुग्णांना वरील शासकीय सेवासुविधा पुरविणे बंधनकारक असून, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने क्षयरुग्णांना लवकर शोधून त्यांना तत्काळ उपचाराखाली आणणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरुग्णांच्या सामाजिक व न्यायिक हक्कासाठी टी. बी. फोरम व कोर्मोरबीडीटीची स्थापना केली आहे.

---..