शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यात वाढत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसागणिक झपाट्याने वाढू लागले आहेत. जिल्ह्यात आता या आजाराचे तब्बल २११ ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसागणिक झपाट्याने वाढू लागले आहेत. जिल्ह्यात आता या आजाराचे तब्बल २११ रुग्ण झाले असून त्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविले असून ५७ रुग्णांना यशस्वी उपचार करून घरी सोडले आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. ठाणे शहरात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले, परंतु आता ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशांनादेखील त्याची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर योग्य ते उपचार घेणे हाच यावरील मार्ग असल्याचे सांगितले जात आहे.

- नवी मुंबईत आठ तर केडीएमसीत १० मृत्यू

जिल्ह्यात सर्वाधिक ८५ रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. तर त्या खालोखाल नवी मुंबईत ५३, कल्याण-डोंबिवलीमध्ये ४४, उल्हासनगर ३, भिवंडी १, मीरा-भाईंदर २३, अंबरनाथ १, बदलापूर १ अशी या रुग्णांची संख्या आहे. सुदैवाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचा रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही. तर रोजच्या रोज जिल्ह्यात सरासरी १० च्या आसपास नवे रुग्ण या आजाराचे सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ठाण्यात सात, नवी मुंबईत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून कल्याणमध्ये १० आणि उल्हासनगरमधील एकाचा यात मृत्यू झाला आहे.