शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

कोरोना चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णसंख्याही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या ...

अजित मांडके

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांत घटली आहे. परंतु, प्रत्यक्षात कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे मनपाच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी मनपाकडून दिवसाला १२ हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात होत्या. सध्या हीच संख्या पाच हजारांपर्यंत घटली आहे.

फेब्रुवारीअखेरपासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे ठाणे शहर व जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढले. मार्चअखेरपासून ते २५ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या काही प्रमाणात झपाट्याने वाढली. एप्रिलमध्ये रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. परंतु, एप्रिलच्या मध्यापासून कोरोना चाचण्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत गेल्याने आता रुग्णांची संख्याही घटली आहे. यापूर्वी मनपा आणि खासगी लॅबच्या माध्यमातून दिवसाला १० ते १२ हजार ॲण्टिजेन चाचण्या केल्या जात होत्या. सध्या ही संख्या चार ते पाच हजारांपर्यंत आली आहे. १० ते १२ हजार चाचण्या केल्यानंतर १,७०० ते १,८०० नवे रुग्ण रोज शहरात आढळत होते. परंतु, आता चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या ५०० ते ७०० च्या दरम्यान स्थिरावली आहे.

लॉकडाऊन जाहीर होताच भाजीविक्रेते, दुकानदार तसेच इतर नागरिकांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढली होती. आता त्यांची संख्याही कमी झाली आहे. परिणामी, मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरील संख्याही घटली आहे. एकूणच चाचणीसंख्या घटल्याने रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. रुग्णवाढीचा दर हा १ एप्रिलला ६.५५ टक्के इतका होता. तो आजही किंबहुना मागील काही दिवस ७.८६ टक्क्यांवर स्थिरावल्याचेही दिसत आहे.

तारीख - चाचणीसंख्या- रुग्णसंख्या- पॉझिटिव्हिटी दर

१ एप्रिल - ६४६३ - १४३२- ६.५५

८ एप्रिल - ७३५० - १८८३ - ६.६६

१५ एप्रिल - १०४५० - १५०५ -७.२५

२१ एप्रिल - १०६५० - १२९० - ७.४३

२८ एप्रिल - ५३५० - ७७० - ७.७२

१ मे - ५१२५ - ६८८ - ७.७९

२ मे - ४२२५ - ७५६ - ७.८४

३ मे - ५२२५ - ५१६ - ७. ८४

४ मे - ४७०३ - ५५२ - ७.८६

----------

आरटीपीसीआरचे अहवाल पॉझिटिव्ह

ठाण्यात ॲण्टिजेनपेक्षा आरटीपीसीआरचे अहवाल हे अत्यंत योग्य आणि बिनचूक येत असल्याने नागरिकांचा कल हा आरटीपीसीआर चाचणी करण्याकडे अधिक आहे. यातील ७० टक्के अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याचे दिसून येत आहे.

-----------

ॲण्टिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर पॉझिटिव्हचे प्रमाण किती

ॲण्टिजेन चाचणी करताना ती १०० टक्के योग्य येईल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाची ॲण्टिजेन चाचणी निगेटिव्ह आली, तर डॉक्टर त्याला आरटीपीसीआर करण्याचा सल्ला देतात. त्यात त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह येतो. त्यामुळे डॉक्टर थेट आरटीपीसीआर करण्यास रुग्णांना सांगत आहेत. त्यामुळे दिवस वाचतात आणि चिंताही कमी होते. त्यातही ॲण्टिजेनचे अहवाल हे ३० ते ३५ टक्केच योग्य येत आहेत. तर, आरटीपीसीआरचे अहवाल हे खात्रीशीर असल्याने ते निगेटिव्ह आले तर रुग्णही निश्चिंत होतात.

-----------

ठाणे मनपाने कोणत्याही प्रकारे कोरोना चाचण्या कमी केलेल्या नाहीत. रुग्णसंख्या कमी झाल्यानेच चाचण्यांचे प्रमाणही काहीसे घटले आहे. म्हणून रुग्णांची संख्या कमी येत आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आमची आजही दिवसाला १२ हजार कोरोना चाचणी करण्याची क्षमता आहे. परंतु, लॉकडाऊनच्या काळात भाजीविक्रेते, दुकानदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांनाही चाचणी बंधनकारक केल्याने कोरोना चाचण्याही जास्त प्रमाणात होत होत्या.

संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

-------------