शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘नागुबाई’ला १८ लाखांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:46 IST

विस्थापितांनी घरे सोडली : केडीएमसीकडून थट्टा सुरू असल्याने घेतली मुख्यालयात धाव

- मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : डोंबिवलीतील नागुबाई निवास या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची कल्याण, कचोरे येथील महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पाच्या घरांत पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र, त्याठिकाणी वीज व पाण््याची सोय नसल्याने वैतागलेल्या सर्व रहिवाशांनी घरे सोडून आठ महिने झाले आहेत. आता महापालिकेने नागुबाई निवासच्या मालकाला १८ लाख भरण्याची नोटीस धाडली आहे. महापालिकेचे पुनर्वसन धोरण किती बेगडी आहे, तसेच या रहिवाशांची प्रशासनाने थट्टा उडवल्याने या नागरिकांनी महापालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महापालिका हद्दीत ५०१ धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे. महापालिका दरपावसाळ्यात धोकादायक इमारतींना नोटीस देऊन घरे रिकामी करण्यास सांगते. मात्र, पर्यायी व्यवस्थेबाबत महापालिकेकडे कधीच उत्तर नसते. महापालिकेने संक्रमण शिबिरे विकसित केलेली नाही. महापालिकेची निवारा केंद्रे चार ते पाच लोक राहू शकतील, अशी आहेत. दि. २६ आॅक्टोबर २०१७ रोजी नागुबाई निवास या धोकादायक इमारतीला तडे गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले. नागूबाईमध्ये ७२ कुटुंबे भाडेतत्त्वावर राहत होती. ३० वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीचा पुनर्विकास करणे गरजेचे होते. इमारतीचे मालक भरत जोशी यांनी पुनर्विकासाची तयारी दाखवली आहे. मात्र, धोकादायक इमारतीमधील नागरिकांची पर्यायी व्यवस्था काय करायची, याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. ‘लोकमत’ने त्याचा पाठपुरावा केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांना बीएसयूपी प्रकल्पात उभारलेल्या घरांत रहिवाशांचे पुनर्वसन करण्यास सांगितले. मात्र, बीएसयूपी प्रकल्पातील घरांमध्ये धोकादायक इमारतीतील रहिवाशांची पर्यायी निवासव्यवस्था करता येत नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे विशेष बाब म्हणून तसे आदेश महापालिकेस देण्याकरिता पालकमंत्र्यांनी राज्य सरकारला भाग पाडले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ६ नोव्हेंबर २०१७ रोजी ३५ रहिवाशांना कल्याणच्या कचोरे येथील बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये तात्पुरती घरे दिली गेली. ३५ पैकी केवळ २१ जणांनी चाव्या घेतल्या होत्या. उर्वरित नऊ रहिवासी प्रत्यक्षात त्याठिकाणी आलेच नाही. २१ जणांना महापालिकेने वीज व पाण्याचे बिल धाडले. नागुबाई निवासमध्ये रहिवाशांकडून ८०० ते एक हजार रुपये भाडे आकारले जात होते. महापालिकेने बीएसयूपी घरातील वास्तव्याकरिता प्रत्येकाकडून सहा हजार ५०० रुपयांचे भाडे आकारले. इतकेच नाही तर महापालिकेने मालमत्ताकराची मागणीही या मंडळींकडून केली आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या या रहिवाशांनी बीएसयूपी योजनेतील घरे सोडून इतरत्र पर्यायी व्यवस्था शोधली.

नागुबाई निवास इमारतीचे मालक जोशी यांना महापालिकेने नोटीस पाठवून बीएसयूपीच्या घरात काही काळ राहिलेल्या या रहिवाशांवर भाड्याचा बोजा टाकला. जोशी यांना १८ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठवली. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवला असताना महापालिकेने रहिवाशांकडे किंवा मूळ इमारतमालकाकडे मालमत्ता कराची, वीज व पाणीपुरवठ्याच्या बिलांची मागणी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल रहिवाशांनी केला. बिल दिले नाही म्हणून वीज, पाणीपुरवठा खंडित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल रहिवाशांनी केला. या प्रकाराला कंटाळून रहिवासी संजय पवार यांच्यासह अन्य काही मंडळींनी महापालिकेत धाव घेतली. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व गटनेते दशरथ घाडीगावकर यांची भेट घेतली.सभापती म्हात्रे यांनी महापालिकेचे करनिर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांना जाब विचारला असता तत्कालीन आयुक्तांच्या सांगण्यावरून मालमत्ताकर वसूल करण्यात आला होता. यावर मार्ग काढण्याकरिता हा विषय महासभेत घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.इमारतींमध्ये सुविधांचा अभावकाही दिवसांपूर्वी बीएसयूपीच्या कचोरे येथील प्रकल्पात ज्या लाभार्थ्यांना घरे दिली आहेत, त्या इमारतीमध्ये व परिसरात महापालिका स्वच्छता व अन्य सोयीसुविधा पुरवत नाही. त्याठिकाणची लिफ्ट नादुरुस्त आहे. त्याकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे.