शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

एनआरसी कामगारांचा थकीत देण्यांसाठी आज मोर्चा; ट्रेड युनियन काँग्रेसची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक

कल्याण : आंबिवली येथील दहा वर्षांपासून बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांना थकीत देणी द्यावीत, या मागणीसाठी गुरुवारी एनआरसी कंपनी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे देण्यात आली.

कंपनीत कंत्राटी कामगारांची संख्या सोडून चार हजार ४४४ कामगार होते. आशिया खंडातील एनआरसी कंपनी ही कापड उद्योगातील सगळ्यात मोठी कंपनी होती. व्यवस्थापनाने आर्थिक डबघाईचे कारण सांगून नाव्हेंबर २००९ मध्ये कंपनीला टाळे ठोकले, तेव्हापासून आजपर्यंत कामगार थकीत देणी मिळावीत, यासाठी संघर्ष करत आहेत. या प्रकरणी ठाणे औद्योगिक न्यायालयात कामगारांनी दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ट आहे.

कंपनी बंंद पडल्यावर कंपनीची मोकळी जागा रहेजा बिल्डरला विकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कंपनीकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेस मालमत्ता करापोटी जवळापास ७१ कोटींची थकबाकी येणे आहे. त्यामुळे कंपनीची जागा विकण्यास कशी परवानगी दिली गेली, अशी हरकत कामगारांनी त्या वेळी घेतली होती. हे प्रकरण पार मंत्रालयात गेले होेते. बंद कंपन्यांची प्रकरणे बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड फायन्सास रिकन्स्ट्रक्शनकडे वर्ग केली जातात. मात्र, मोदी सरकारने हे बोर्ड रद्द केले. त्यामुळे एनआरसीच्या कामगारांचा विषय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या (नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युल) मुंबई खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. कंपनीच्या कामगारांकडून त्यांच्या थकबाकीविषयी लवादाने दावे भरून घेतले. आता लवादाने एक पत्र काढले असून, त्यानुसार ६८ कोटी रुपये देण्याचा विषय नमूद केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये दाखल केलेल्या दाव्यानुसार कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांनी कामगारांना थकीत देण्यापोटी ९८२ कोटी देण्याचा विषय पुढे आला.

कंपनीचा बंद प्लांट बंद असून, तो भंगार अवस्थेत पडून आहे. त्यापैकी १०० एकर जागा घेण्यास अदानी ग्रुपने स्वारस्य दाखविले होते. त्यामुळे कामगारांच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या. मात्र, ‘रहेजा’शी केलेला करार रद्द झाला आहे की नाही, असा सवाल संघटनेने केला आहे.तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार?कामगारांची संख्या चार हजार ४४४ असेल, तर ६८ कोटींची रक्कम देण्यासंदर्भातील लवादाने दिलेले पत्र हे कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.विविध कामगार संघटनांचा दावा आहे की, कंपनी कामगारांना एक हजार ३८४ कोटी रुपयांचे देणे लागते. केवळ कायम कामगारांचा विचार करून चालणार नाही. तर २००६ मध्ये निवृत्त झालेल्या कामगारांनाही निवृत्तीनंतरचा मोबदला कंपनीकडून मिळालेला नाही.काही कामगारांना मध्यंतरी कंपनी व्यवस्थापनाने बोलावून त्यांच्या नावे किमान ३५ ते ४० लाख रुपये थकबाकीचा हिशेब निघतो, असे सांगितले होते. त्याची वाच्यता कामगार आज करीत आहेत.