शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

एनआरसी कामगारांचे ८४१ कोटी दिल्याखेरीज भंगारविक्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:58 IST

मोहने येथील नॅशनल रेयॉन कंपनी (एनआरसी) जोपर्यंत कामगारांची ८४१ कोटींची थकबाकी देत नाही, तोपर्यंत कंपनीच्या आवारातील भंगार विकू नये, असे आदेश कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी

कल्याण : मोहने येथील नॅशनल रेयॉन कंपनी (एनआरसी) जोपर्यंत कामगारांची ८४१ कोटींची थकबाकी देत नाही, तोपर्यंत कंपनीच्या आवारातील भंगार विकू नये, असे आदेश कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सोमवारी कंपनी व्यवस्थापन व कामगार आयुक्तांना दिले. २००९ मध्ये कंपनी बंद पडली, तेव्हापासून थकबाकी न मिळाल्याने कामगारांची परवड सुरू आहे.कामगार प्रतिनिधींना घेऊन भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी कामगारमंत्री निलंगेकर यांची भेट घेतली. व्यवस्थापनाने कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे कारण पुढे करत २००९ साली कंपनीला टाळे ठोकले. परिणामी, कंपनीतील कायमस्वरूपी व अस्थायी असे एकूण चार हजार ५०० कामगार बेरोजगार झाले. कंपनीने कामगारांची देणी अद्याप दिलेली नाहीत. कंपनीने जागाविक्रीचा व्यवहार केला आहे. कंपनीकडे महापालिकेची ६० कोटी रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी आहे. व्यवस्थापन त्याविरोधात न्यायालयात गेले आहे. थकबाकी असतानाही पालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांनी नाहरकत दाखला दिला होता. हा दाखला रद्द करण्याचा मुद्दा अनेक वेळा उपस्थित झाला आहे. ही कंपनी आजारी उद्योग असल्याचा खटला बीएफआयआरमध्ये सुरू आहे. कंपनी कामगारांची देणी देत नसल्याने कंपनी दिवाळीखोरीत गेल्याचे घोषित करण्यासाठी कामगार नेते उदय चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा खटल्यांसाठी वेगळे न्यायालय असल्याने ही याचिका त्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी येणार आहे.