शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

एनआरसी वसाहतीत ना वीज ना पाणी!

By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST

एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.

कल्याण : एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ही वसाहत पाच दिवसांपासून अंधारात आहे. विजेअभावी वसाहतीतील नागरिकांना घरात पाणीही मिळत नाही. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते. संतप्त रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली मुख्यालयात धाव घेतली. एनआरसी कंपनीने ९ नोव्हेंबर २००९ ला आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कंपनीला टाळे ठोकले. कापड उद्योगनिर्मितीत असलेल्या कंपनीचा आशिया खंडात नावलौकिक होता. कंपनीने कामगारांसाठी वसाहत उभारली होती. जवळपास १४०० सदनिका या वसाहतीत आहेत. कंपनी बंद पडल्यावरही त्यात तीन हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. कंपनीने कामगारांची थकीत देणी अजूनही दिलेली नाहीत. तो वाद न्यायप्रविष्ट आहे. मालकाने कंपनीची जागा विकली असून तो व्यवहारही वादग्रस्त ठरला आहे. एनआरसी वसाहतीला महावितरणकडून वीजपुरवठा होत आहे. त्याचे बिल कंपनी भरत होती. परंतु, सध्या कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली आहे. यापूर्वीही वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. जवळपास नऊ कोटी रुपयांची थकबाकी कंपनी व्यवस्थापनाने भरली नाही. त्यामुळे महावितरणने एनआरसी वसाहतीचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी खंडित केला आहे. त्यामुळे वसाहतीमधील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. पाणी आणि विजेविना आम्ही त्रस्त आहोत, असे फरिदा पठाण, सुनंदा लोंढे, प्राजक्ता कूळधरण, श्रीकांत कांबळे, सूर्यप्रताप सिंग आणि रोहित सोनावणे या रहिवाशांनी सांगितले.वसाहतीमधील रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत गुरुवारी धाव घेतली. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांची भेट घेतली. वसाहतीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तेथे एका नळाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. (प्रतिनिधी)