शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

एनआरसी वसाहतीत ना वीज ना पाणी!

By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST

एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.

कल्याण : एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ही वसाहत पाच दिवसांपासून अंधारात आहे. विजेअभावी वसाहतीतील नागरिकांना घरात पाणीही मिळत नाही. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते. संतप्त रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली मुख्यालयात धाव घेतली. एनआरसी कंपनीने ९ नोव्हेंबर २००९ ला आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कंपनीला टाळे ठोकले. कापड उद्योगनिर्मितीत असलेल्या कंपनीचा आशिया खंडात नावलौकिक होता. कंपनीने कामगारांसाठी वसाहत उभारली होती. जवळपास १४०० सदनिका या वसाहतीत आहेत. कंपनी बंद पडल्यावरही त्यात तीन हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. कंपनीने कामगारांची थकीत देणी अजूनही दिलेली नाहीत. तो वाद न्यायप्रविष्ट आहे. मालकाने कंपनीची जागा विकली असून तो व्यवहारही वादग्रस्त ठरला आहे. एनआरसी वसाहतीला महावितरणकडून वीजपुरवठा होत आहे. त्याचे बिल कंपनी भरत होती. परंतु, सध्या कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली आहे. यापूर्वीही वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. जवळपास नऊ कोटी रुपयांची थकबाकी कंपनी व्यवस्थापनाने भरली नाही. त्यामुळे महावितरणने एनआरसी वसाहतीचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी खंडित केला आहे. त्यामुळे वसाहतीमधील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. पाणी आणि विजेविना आम्ही त्रस्त आहोत, असे फरिदा पठाण, सुनंदा लोंढे, प्राजक्ता कूळधरण, श्रीकांत कांबळे, सूर्यप्रताप सिंग आणि रोहित सोनावणे या रहिवाशांनी सांगितले.वसाहतीमधील रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत गुरुवारी धाव घेतली. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांची भेट घेतली. वसाहतीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तेथे एका नळाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. (प्रतिनिधी)