शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

एनआरसी वसाहतीत ना वीज ना पाणी!

By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST

एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.

कल्याण : एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ही वसाहत पाच दिवसांपासून अंधारात आहे. विजेअभावी वसाहतीतील नागरिकांना घरात पाणीही मिळत नाही. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते. संतप्त रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली मुख्यालयात धाव घेतली. एनआरसी कंपनीने ९ नोव्हेंबर २००९ ला आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कंपनीला टाळे ठोकले. कापड उद्योगनिर्मितीत असलेल्या कंपनीचा आशिया खंडात नावलौकिक होता. कंपनीने कामगारांसाठी वसाहत उभारली होती. जवळपास १४०० सदनिका या वसाहतीत आहेत. कंपनी बंद पडल्यावरही त्यात तीन हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. कंपनीने कामगारांची थकीत देणी अजूनही दिलेली नाहीत. तो वाद न्यायप्रविष्ट आहे. मालकाने कंपनीची जागा विकली असून तो व्यवहारही वादग्रस्त ठरला आहे. एनआरसी वसाहतीला महावितरणकडून वीजपुरवठा होत आहे. त्याचे बिल कंपनी भरत होती. परंतु, सध्या कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली आहे. यापूर्वीही वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. जवळपास नऊ कोटी रुपयांची थकबाकी कंपनी व्यवस्थापनाने भरली नाही. त्यामुळे महावितरणने एनआरसी वसाहतीचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी खंडित केला आहे. त्यामुळे वसाहतीमधील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. पाणी आणि विजेविना आम्ही त्रस्त आहोत, असे फरिदा पठाण, सुनंदा लोंढे, प्राजक्ता कूळधरण, श्रीकांत कांबळे, सूर्यप्रताप सिंग आणि रोहित सोनावणे या रहिवाशांनी सांगितले.वसाहतीमधील रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत गुरुवारी धाव घेतली. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांची भेट घेतली. वसाहतीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तेथे एका नळाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. (प्रतिनिधी)