शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

एनआरसी वसाहतीची वीज-पाणी तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:07 IST

 एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीत ८०० कामगारांची घरे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कामगार राहतात. जी घरे  रिकामी आहेत ती पाडण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एनआरसी कंपनी अदानी समूहाने लिलावात घेतल्याने कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. वसाहतीमधील वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा रविवारी सायंकाळपासून खंडित झाला आहे. यापूर्वी रहिवाशांचे पाणी तोडले आहे. वसाहतीमधील नागरिकांनी घरे रिकामी करावीत याकरिता हे पाऊल उचलल्याचा आरोप रहिवाशांनी केला. एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीत ८०० कामगारांची घरे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कामगार राहतात. जी घरे  रिकामी आहेत ती पाडण्याचे काम सुरू आहे. या पाडकामाला कामगारांचा विरोध आहे. कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना पाडकाम कसे काय केले जात आहे. दोन महिन्यांपासून कामगार वारंवार पाडकामाला विरोध करीत आहेत. आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा करणारी वाहिनी जेसीबीमुळे तुटली किंवा जळाली असे सांगण्यात येत आहे. अदानीने कंपनीची जागा घेतली आहे. त्यांच्याकडून ताबा घेणे सुरू आहे. मात्र या ताबापत्रात घरे तोडण्यास परवानगी दिली आहे का, असा सवाल कामगारांनी केला आहे. यापूर्वी कामगार वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा आणि आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. कामगार वसाहतीमधील नागरिकांना त्रास देऊन त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप कामगार रामदास पाटील यांनी केला.

शुक्रवारी मुंबईत होणार बैठककेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक बोलावली आहे. या बैठकीस संबंधितांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एनआरसी कामगार संघर्ष समितीचे भीमराव डोळस यांनी एनआरसी प्रकरणात आठवले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती.