शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता सरपंच किमान बारावी ?

By admin | Updated: May 22, 2017 01:47 IST

सरपंच व पंचायतीतील विविध समित्यांच्या सदस्य पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही पात्रता असावी असा कायदा करण्याचा आग्रह ग्रामविकास खात्याने

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : सरपंच व पंचायतीतील विविध समित्यांच्या सदस्य पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही पात्रता असावी असा कायदा करण्याचा आग्रह ग्रामविकास खात्याने मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धरला असून त्याला लवकरच मूर्त स्वरुप मिळण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतींना पेसा कायद्यामुळे व आमचा गाव आमचा विकास आणि ग्रामसभामुळे मोठा निधी आणि व्यापक अधिकार प्राप्त झालेले असल्याने त्याचा विनियोग व वापर योग्य रितीने होणे आवश्यक आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने अनेक ठिकाणी झेरॉक्स निर्माण झाले आहेत त्यांना आळा घालण्यासाठी या शैक्षणिक पात्रतेचे बंधन असणे ग्रामविकास विभागाला आवश्यक वाटते आहे. हा कायदा झाला तर गावांच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल, अशीही या खात्याची धारणा आहे.सध्या सरपंच पदासाठी व पंचायतीच्या कमिटीच्या सदस्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसल्याने अशिक्षित, कमी शिकलेले उमेदवार विजयी होऊन या पदांचा कार्यभार सांभाळत आहे़ त्यामुळे अनेक ठिकाणी गटविकास अधिकारी अथवा अन्य एखादा सुशिक्षित किंवा ग्रामसेवक यांच्या तंत्राने ग्रामपंचायतींचा कारभार चालविला जात आहे़ तसेच अनेक सरकारी योजना ग्रामपंचायतीमध्ये येत असतात, आता तर शासनाने पेसा काद्यांतर्गत मुबलक निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन दिलेला आहे़ परंतु शिक्षण कमी असलेल्या सरपंचांना अगर सदस्यांना या योजनांची सविस्तर माहिती होत नसल्याने त्याचा गावातील होणाऱ्या विकास कामांवर परिणाम होतो आहे़ त्याअनुषंगाने ही बाब ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास देखील आली होती़ त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढविण्यास किमान १२ वी उत्तीर्णतेची अट असावी असा आग्रह ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे धरल्याचे समजते़जर हा कायदा संमत झाला व १२ वी पास सरपंच पदाची अट ग्राह्य धरली गेली तर ग्रामीण भागातून या कायद्याचे स्वागत होईल, आज अनेक ठिकाणी अशिक्षितपणामुळे मिळणारा स्थानिक स्वराज्यं संस्थेचा निधी वापरा विना पडून राहातो व दिलेल्या मुदतीत त्याचा वापर न झाल्याने तो परत जातो असेही प्रकार घडत असतात,जर सरपंच सक्षम असेल शिक्षित असेल तर तो ग्रामपंचायतीच्या व गावाच्या हिताचे निर्णय स्वतंत्ररित्या घेऊ शकेल, त्यामुळे सरपंच हा किमान १२ वी असणे हे योग्य ठरणार आहे तर ग्रामपंचायतीमधील इतर सदस्यांसाठी ही शिक्षणाची अट ठेवली पाहीजे असल्याचे मत जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत़ कारण लोेकप्रतिनिधी हा मतदार आपल्या गावाच्या विकास साध्य करण्यासाठी निवडून देत असतात व त्याच्या हातामध्ये ५ वर्षाचा कार्यकाळ हा विकास साधण्याकरीता असतो जर तोच शिक्षित नसेल तर गावाचा विकास काय साध्य करणार असा सवाल ही उपस्थित केला जात आहे़ आज ५० टक्के आरक्षणानुसार महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे़ त्यानुसार एकुण ग्रामपंचायतीच्या ५० टक्के ग्रामपंचायतीवर महिला सरंपच आहेत़ त्यामध्ये बहुतेक या कमी शिक्षण घेतलेल्याच आहेत़ त्यामुळे त्यांना ग्रामपंचायतस्तरावरील अनेक बाबतीत निर्णय घेतांना अडचणी निर्माण होत असल्याने हे निर्णय त्यांचा पती अगर त्यांचे नातेवाईक वा त्यांच्या मर्जीतील ग्रामपंचायत सदस्य घेत आहेत व त्यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावयाची अशी पध्दत आजही अनेक भागामध्ये आहे जर १२ वी पास शिक्षित सरपंच असेल तर महिला सरपंच देखील सक्षमपणे आपला निर्णय घेण्यास पात्र ठरणार आहेत़ दरम्यान शासन आता ग्रामपंचायती देखील डिजीटल करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यासाठी देखील ग्रामपंचायतीचा सरपंच हा सुशिक्षितच असावा लागेल. केंद्र आणि राज्यांच्या ग्रामीण भागातील अनेक योजना राबविण्याचे काम गावपातळीवर होत असल्यामुळे याबाबतचा कायदा लवकरच अपेक्षित आहे.