शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
3
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
4
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
5
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
6
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
7
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
8
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
9
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
10
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
11
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
12
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
13
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
14
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
15
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
16
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
17
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
18
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
19
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
20
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

...आता जनजागृतीसाठीही कंत्राट ,स्वच्छ भारत अभियान : स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:57 IST

स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे.

कल्याण : स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे. जनजागृतीसाठी महापालिका एक कोटी ३५ लाख ३७ हजार ५३० रुपये खर्च करणार आहे.स्वच्छतेच्या जागृतीसाठी चार निविदा आल्या होत्या. यातील कमी दराची मे. कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रा.लि. या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी काही उद्दिष्टे केडीएमसीने समोर ठेवली आहेत. यात घरोघरी ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र कचरा डबा ठेवण्यास प्रवृत्त करणे, ओल्या कचºयाचे स्थानिक पातळीवर विघटन करण्यासाठी कम्पोस्टिंग ओडब्ल्यूसी मशीनचा वापर करणे, घंटागाडीचा नियमित वापर करून सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंड्यांचे प्रमाण कमी करणे, प्लास्टिकचे निर्मूलन करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध मावळण्यासाठी प्रबोधन करणे, महापालिकेच्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देणे, उघड्यावर शौचास बसणाºया नागरिकांमध्ये जागृती करून त्यांना त्यापासून परावृत्त करणे आदींचा समावेश आहे.दरम्यान, आता या अभियानाच्या जागृतीसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या अभियानाचा कालावधी १ जानेवारी २०१७ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला उशिरा जाग आली का, असाही सवाल उपस्थित होत आहे.