शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

‘शाई’त बुडणाऱ्या गावांची संख्या आता वाढणार

By admin | Updated: April 17, 2017 04:51 IST

शाई धरणाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने या धरणाची जागा बदलण्यासाठी जोरदार

सुरेश लोखंडे, ठाणेशाई धरणाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने या धरणाची जागा बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. शहापूर तालुक्यातील नामपाडाऐवजी सहा किमीवरील उमगाच्या दिशेने ढाड्रा गावाजवळ धरण बांधण्याचा नवा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामुळे ५५ ऐवजी सुमारे ६५ गावपाड्यांना या धरणात जलसमाधी मिळणार आहे. धरणाची जागा बदलवून दोन पाडे वाचवत असल्याचा गवगवा शासन करीत आहे; पण त्या बदल्यात उगमाकडील १० मोठमोठ्या महसुली गावांना या नव्या प्रस्तावामुळे जलसमाधी मिळणार आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील प्रारंभीची ढाड्रा, गुंडा, साकुर्ली, पाचघर मठ येथून ते डोळखांब विभागातील डिहणे, पडगावपर्यंतची ४५ गावे या धरणात बुडणार आहेत. मुरबाड तालुक्यातील शिरोशी, वेळूक आदी १६ महसुली गावे आणि दोन्ही तालुक्यांतील पाडे आदी ६५ ते ६८ गावपाडे नवीन प्रस्तावामुळे शाई धरणात बुडणार आहे. यामुळे शाई धरण शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी संघर्ष तीव्र करीत गावोगाव मेळाव्यांचे आयोजन केल्याचे या संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारघडे यांनी सांगितले. शाईच्या जागेत बदल करून धरणाच्या वरच्या दिशेने ढाड्रा गावाजवळ नवीन जागा पाटबंधारे विभागाने निश्चित केल्याची चाहूल या शेतकऱ्यांना लागली आहे. या धरणाची जागा बदलवण्यात आली; मात्र उंची १८० फूट कायम ठेवली आहे. यामुळे शाई नदीच्या उगमापर्यंत हे पाणी पसरणार आहे. यात शहापूरच्या पाच मोठ्या ग्रामपंचायतींचे १५ गावपाडे १०० टक्के बुडणार, तर मुरबाडचे १३ गावे व पाडे बुडणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे तीन हजार ४० हेक्टर शेती बुडणार आहे. वनखात्याचे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रातील जंगल बुडणार आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी एमएमआरडीए सुमारे ४५२ कोटी खर्चून शाई धरण बांधणार आहे. पण, सुमारे १० वर्षांपासून शेतकऱ्यांनी त्याविरोधात तीव्र संघर्ष सुरू ठेवला आहे. सध्या या धरणाच्या मालकीसाठी ठाणे महापालिका आघाडीवर आहे. वाढीव पाणीसाठा करण्यासाठी या धरणाची मूळ जागा बदलून नव्या जागेचा प्रस्ताव करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे; पण १४ छोटी बंधारे बांधण्याची तयारी दाखवणाऱ्या या शेतकऱ्यांनी शाई धरणाचा विरोध कायम ठेवला आहे.