शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

आता शासकीय कोषागारातून स्वातंत्र्यसैनिकांना मानधन

By admin | Updated: July 27, 2015 03:07 IST

भारतीय स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्राम यासारख्या महत्त्वाच्या लढ्यांत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना

ठाणे : भारतीय स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्राम यासारख्या महत्त्वाच्या लढ्यांत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळत असून यापुढे ते शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार विभागामार्फत दिले जाणार असून, त्याचा लाभ ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सुमारे ९० स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार आहे.राज्यात सन १९६५ पासून स्वातंत्र्यसैनिक मानधन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दरमहा १० हजार रुपये अदा केले जातात. २२ जुलै १९८६ पासून बँकेमार्फत मानधन घेण्यास इच्छुक असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना बँकामार्फत ते घेण्याचा पर्याय देण्यात आला होता. तथापि, स्वातंत्र्यसैनिक मानधनावर झालेल्या खर्चाची माहिती बँकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयांना विहीत कालावधीत मिळत नाही. त्यामुळे या खर्चाची एकत्रित माहिती शासनास प्राप्त होत नसल्याने अनेक वित्तीय व प्रशासकीय अडचणी उद्भवतात. याचदरम्यान, शासनाने नवीन जीआर काढून स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन आणि अन्य सवलती कोषागारांमार्फत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये ही माहिती भरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनाची प्रकरणे हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन लवकरच कोषागार विभागामार्फत दिले जाणार आहे.