शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

आता शासकीय कोषागारातून स्वातंत्र्यसैनिकांना मानधन

By admin | Updated: July 27, 2015 03:07 IST

भारतीय स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्राम यासारख्या महत्त्वाच्या लढ्यांत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना

ठाणे : भारतीय स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्राम यासारख्या महत्त्वाच्या लढ्यांत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळत असून यापुढे ते शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागार विभागामार्फत दिले जाणार असून, त्याचा लाभ ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सुमारे ९० स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार आहे.राज्यात सन १९६५ पासून स्वातंत्र्यसैनिक मानधन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दरमहा १० हजार रुपये अदा केले जातात. २२ जुलै १९८६ पासून बँकेमार्फत मानधन घेण्यास इच्छुक असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना बँकामार्फत ते घेण्याचा पर्याय देण्यात आला होता. तथापि, स्वातंत्र्यसैनिक मानधनावर झालेल्या खर्चाची माहिती बँकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयांना विहीत कालावधीत मिळत नाही. त्यामुळे या खर्चाची एकत्रित माहिती शासनास प्राप्त होत नसल्याने अनेक वित्तीय व प्रशासकीय अडचणी उद्भवतात. याचदरम्यान, शासनाने नवीन जीआर काढून स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन आणि अन्य सवलती कोषागारांमार्फत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये ही माहिती भरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनाची प्रकरणे हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन लवकरच कोषागार विभागामार्फत दिले जाणार आहे.