शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आता भरणार ‘आगरी शाला’,  १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 16:51 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत आगरी शाला भरली जाणार आहे. १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआता भरणार ‘आगरी शाला’१० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्गप्रशिक्षण वर्ग भिवंडीतील कशेळी गावात भरणार

ठाणे : १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे. ‘आगरी शाला’ याचे प्रशिक्षण वर्ग भिवंडीतील कशेळी गावात भरणार आहेत. या ‘आगरी शाला’ प्रयोगासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे.  

     मुंबई-ठाणे-रायगड-नाशिक मधील स्थानिकांची बोली म्हणजे आगरी बोली. प्रसार माध्यमात तसेच विविध मालिकांमध्ये सर्रास वापरली जाणारी बोली तिच्या गोडव्यामुळे आपल्याला ठाऊक आहे. परंतू अनेकांना या भाषेचे नेमके पैलु माहित नाहीत. तसेच ईंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली आगरी बोलीचा वापर हा कमी होत चाल्ला असून परिणामी ही बोली बोलणार्या वर्गाला ह्या भाषेचा विसर पडत चाल्ला आहेच. ह्यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रविंद्र तरे यांनी १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे. सर्वेश तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून ९० व्या अ.भा साहित्य संमेलनातील बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रयोगासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील,आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील,आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील,९० व्या अ.भा साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डाॅ.अनिल रत्नाकर,प्रसिध्द कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच लोकगीतातील गीतकार संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या ‘आगरी शाला’ प्रयोगा अंतर्गत सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लघु पाठ्यक्रम असलेल पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्य चा समावेश असेल,याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी स्वत: केले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त आगरी भाषा प्रेमींनी मग ते कोणत्याही वयोगटातले असोत त्यांनी सहभाग घ्यावा असे सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून इच्छूकांनी आपली माहिती sarvyatare@gmail.comवर पाठवावी वा ९०९६७२०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या आगरी बोलीतील प्रयोगानंतर इतरही बोलीत असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डाॅ.अनिल रत्नाकर यांनी सांगीतले आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई