शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आता ठाणे जिल्ह्यातून बाहेर पडणाऱ्यांसाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST

ठाणे : राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक ...

ठाणे : राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक केला आहे. वैद्यकीय अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना सक्षम प्राधिकरणाद्वारे हा ई-पास दिला जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले असल्यास, लग्नसमारंभ, रुग्णालयीन आणीबाणीचे काम आणि वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा शहरात जाण्यासाठी पोलिसांतर्फे ई-पास सुविधा देण्यात येणार आहे. संबंधितांनी पोलिसांकडे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक प्रवासासाठी खासगी व्यक्तींना या प्रवासाची अनुमती दिली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर संबंधितांना अर्जावर टोकन क्रमांक दिला जाणार आहे. त्यानंतर संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण २४ तासांमध्ये अर्ज मंजूर केला जाणार आहे. जर कारण अयोग्य असल्यास हा अर्ज नामंजूर होऊ शकतो. यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय सेवा त्याचबरोबर मेडिकल सेवांशी संबंधितांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास करता येणार आहे. त्यांना अशा ई-पासची आवश्यकता नाही.

* ज्या खाजगी व्यक्ती अत्यावश्यक सेवेशी संबंधित नाहीत, ज्यांना विशेष कारणासाठी शहराबाहेर किंवा आंतरजिल्हा प्रवास करण्याची गरज आहे, त्यांनीच असे पास मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून उभारलेल्या जिल्हा आणि शहरांच्या सीमेवर हे पास तपासले जाणार आहेत. जर असा पास नसल्यास संबंधितांना पुन्हा आपल्या शहरात माघारी फिरावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.