शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आता ठाणे जिल्ह्यातून बाहेर पडणाऱ्यांसाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST

ठाणे : राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक ...

ठाणे : राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक केला आहे. वैद्यकीय अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना सक्षम प्राधिकरणाद्वारे हा ई-पास दिला जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले असल्यास, लग्नसमारंभ, रुग्णालयीन आणीबाणीचे काम आणि वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा शहरात जाण्यासाठी पोलिसांतर्फे ई-पास सुविधा देण्यात येणार आहे. संबंधितांनी पोलिसांकडे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक प्रवासासाठी खासगी व्यक्तींना या प्रवासाची अनुमती दिली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर संबंधितांना अर्जावर टोकन क्रमांक दिला जाणार आहे. त्यानंतर संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण २४ तासांमध्ये अर्ज मंजूर केला जाणार आहे. जर कारण अयोग्य असल्यास हा अर्ज नामंजूर होऊ शकतो. यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय सेवा त्याचबरोबर मेडिकल सेवांशी संबंधितांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास करता येणार आहे. त्यांना अशा ई-पासची आवश्यकता नाही.

* ज्या खाजगी व्यक्ती अत्यावश्यक सेवेशी संबंधित नाहीत, ज्यांना विशेष कारणासाठी शहराबाहेर किंवा आंतरजिल्हा प्रवास करण्याची गरज आहे, त्यांनीच असे पास मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून उभारलेल्या जिल्हा आणि शहरांच्या सीमेवर हे पास तपासले जाणार आहेत. जर असा पास नसल्यास संबंधितांना पुन्हा आपल्या शहरात माघारी फिरावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.