शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बी-बियाण्यांच्या नोंदणीसह शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी आता कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व ...

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व कीटकनाशके आदींचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. या पुरवठ्याच्या मागणीसह त्यात येणाऱ्या समस्या, तक्रारी, अडचणी त्वरित सोडवण्यासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या कालावधीत सुरू करण्यात आले आले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात २०२१-२२ या खरीप हंगामासाठी ठाणे विभागातील शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व उत्पादक, वितरक तसेच कृषी सेवा केंद्र परवानाधारकानी सहकार्य करावे. यापैकी कोणीही कर्तव्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने आणि विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी दिला आहे.

ठाणे विभागात भात पिकाचे प्रमुख क्षेत्र असल्याने ते गुणवत्तापूर्ण भात बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग कटिबध्द आहे. त्यासह खते, कीटकनाशक आदींच्या सुरळीत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची मागणी नोंदवण्याकरीता जिल्हा गुणवत्ता व निविष्ठा नियंत्रण कक्ष तैनात केला आहे. ठाणे येथील कोकण विभाग कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी येथे निविष्ठा नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. या कक्षात कृषी निविष्ठा पुरवठा नोंदणी करणे, गुणवत्ताबाबत तक्रारी आणि अडचणींची नोंद शेतकऱ्यांना मोबाइलवर कॉल किंवा व्हॉट‌्सॲप मेसेजद्वारे किंवा इमेलवर पाठवता येणार आहे. याशिवाय तक्रारी, अडचणींची नोंद निविष्ठा संनियंत्रण कक्षातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनिरुद्ध शिंदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील. ठाणे जि.प. विस्तार अधिकारी डी.बी. जावीर यांच्याकडे शेतकऱ्यांना करता येणार आहे.