शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बी-बियाण्यांच्या नोंदणीसह शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी आता कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व ...

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व कीटकनाशके आदींचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. या पुरवठ्याच्या मागणीसह त्यात येणाऱ्या समस्या, तक्रारी, अडचणी त्वरित सोडवण्यासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या कालावधीत सुरू करण्यात आले आले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात २०२१-२२ या खरीप हंगामासाठी ठाणे विभागातील शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व उत्पादक, वितरक तसेच कृषी सेवा केंद्र परवानाधारकानी सहकार्य करावे. यापैकी कोणीही कर्तव्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने आणि विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी दिला आहे.

ठाणे विभागात भात पिकाचे प्रमुख क्षेत्र असल्याने ते गुणवत्तापूर्ण भात बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग कटिबध्द आहे. त्यासह खते, कीटकनाशक आदींच्या सुरळीत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची मागणी नोंदवण्याकरीता जिल्हा गुणवत्ता व निविष्ठा नियंत्रण कक्ष तैनात केला आहे. ठाणे येथील कोकण विभाग कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी येथे निविष्ठा नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. या कक्षात कृषी निविष्ठा पुरवठा नोंदणी करणे, गुणवत्ताबाबत तक्रारी आणि अडचणींची नोंद शेतकऱ्यांना मोबाइलवर कॉल किंवा व्हॉट‌्सॲप मेसेजद्वारे किंवा इमेलवर पाठवता येणार आहे. याशिवाय तक्रारी, अडचणींची नोंद निविष्ठा संनियंत्रण कक्षातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनिरुद्ध शिंदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील. ठाणे जि.प. विस्तार अधिकारी डी.बी. जावीर यांच्याकडे शेतकऱ्यांना करता येणार आहे.