शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

बी-बियाण्यांच्या नोंदणीसह शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी आता कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व ...

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते व कीटकनाशके आदींचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. या पुरवठ्याच्या मागणीसह त्यात येणाऱ्या समस्या, तक्रारी, अडचणी त्वरित सोडवण्यासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या कालावधीत सुरू करण्यात आले आले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात २०२१-२२ या खरीप हंगामासाठी ठाणे विभागातील शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा गुणवत्तापूर्ण तसेच सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व उत्पादक, वितरक तसेच कृषी सेवा केंद्र परवानाधारकानी सहकार्य करावे. यापैकी कोणीही कर्तव्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने आणि विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी दिला आहे.

ठाणे विभागात भात पिकाचे प्रमुख क्षेत्र असल्याने ते गुणवत्तापूर्ण भात बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग कटिबध्द आहे. त्यासह खते, कीटकनाशक आदींच्या सुरळीत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची मागणी नोंदवण्याकरीता जिल्हा गुणवत्ता व निविष्ठा नियंत्रण कक्ष तैनात केला आहे. ठाणे येथील कोकण विभाग कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी येथे निविष्ठा नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. या कक्षात कृषी निविष्ठा पुरवठा नोंदणी करणे, गुणवत्ताबाबत तक्रारी आणि अडचणींची नोंद शेतकऱ्यांना मोबाइलवर कॉल किंवा व्हॉट‌्सॲप मेसेजद्वारे किंवा इमेलवर पाठवता येणार आहे. याशिवाय तक्रारी, अडचणींची नोंद निविष्ठा संनियंत्रण कक्षातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनिरुद्ध शिंदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील. ठाणे जि.प. विस्तार अधिकारी डी.बी. जावीर यांच्याकडे शेतकऱ्यांना करता येणार आहे.