शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

टँकरचालकांना बजावल्या नोटिसा; पाणीचोरीमुळे कामवरी नदी कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:19 IST

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत.

रोहिदास पाटील अनगाव : ‘भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी’ असे वृत्त मंगळवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव यांनी घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत पाणीटंचाईसह दुरवस्था झालेल्या बंधाºयाची पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. नदी कोरडी पडलेली असताना पाणीचोरी सुरूच आहे. याबाबत ग्रामपंचायतीने टँकरमालकांना नोटिसा बजावल्या असल्याचेही जाधव यांनी सांगितले. डाइंग कंपनीला टँकरमधून पाणीपुरवठा होतो.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल आमदार शांताराम मोरे यांनी घेतली. त्यांनी ग्रामसेवक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरही पाणीटंचाई दूर झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. जेव्हा बंधाºयाचे काम सुरू होते, तेव्हा अधिकाºयांनी उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, येथील अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयाची दुरवस्था झाली. बंधारे वाहून गेल्याने पाणी साठून राहत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी संबंधित अधिकाºयांना अहवाल सादर करण्याची सूचना दिली असून नदीपात्राचे खोदकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शेलार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांची सभा घेऊन पाणीचोरांना नोटिसा बजावल्या.

गाळ काढल्यास उन्हाळ्यात फायदा होईलकामवरी नदीतील गाळ काढल्यास पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नदीच्या पाण्याचा उन्हाळ्यात शेतकºयांना भाजीपाला, जनावरांना, नागरिकांना उपयोग होईल. याकरिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनलाल सोनवणे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

अजूनही टंचाई भेडसावत आहेजून महिना उजाडला, तरी नागरिकांना खड्ड्यांतील दूषित पाणी व हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. अधिकारी सांगतात, पाणीटंचाई दूर झाली, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी दौरा करतील का? अधिकाºयांनी कागदोपत्री दाखवलेल्या पाणीटंचाई दूर झाल्यावर विश्वास ठेवणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.