शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचालकांना बजावल्या नोटिसा; पाणीचोरीमुळे कामवरी नदी कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:19 IST

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत.

रोहिदास पाटील अनगाव : ‘भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी’ असे वृत्त मंगळवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव यांनी घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत पाणीटंचाईसह दुरवस्था झालेल्या बंधाºयाची पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. नदी कोरडी पडलेली असताना पाणीचोरी सुरूच आहे. याबाबत ग्रामपंचायतीने टँकरमालकांना नोटिसा बजावल्या असल्याचेही जाधव यांनी सांगितले. डाइंग कंपनीला टँकरमधून पाणीपुरवठा होतो.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल आमदार शांताराम मोरे यांनी घेतली. त्यांनी ग्रामसेवक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरही पाणीटंचाई दूर झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. जेव्हा बंधाºयाचे काम सुरू होते, तेव्हा अधिकाºयांनी उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, येथील अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयाची दुरवस्था झाली. बंधारे वाहून गेल्याने पाणी साठून राहत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी संबंधित अधिकाºयांना अहवाल सादर करण्याची सूचना दिली असून नदीपात्राचे खोदकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शेलार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांची सभा घेऊन पाणीचोरांना नोटिसा बजावल्या.

गाळ काढल्यास उन्हाळ्यात फायदा होईलकामवरी नदीतील गाळ काढल्यास पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नदीच्या पाण्याचा उन्हाळ्यात शेतकºयांना भाजीपाला, जनावरांना, नागरिकांना उपयोग होईल. याकरिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनलाल सोनवणे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

अजूनही टंचाई भेडसावत आहेजून महिना उजाडला, तरी नागरिकांना खड्ड्यांतील दूषित पाणी व हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. अधिकारी सांगतात, पाणीटंचाई दूर झाली, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी दौरा करतील का? अधिकाºयांनी कागदोपत्री दाखवलेल्या पाणीटंचाई दूर झाल्यावर विश्वास ठेवणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.