शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

टँकरचालकांना बजावल्या नोटिसा; पाणीचोरीमुळे कामवरी नदी कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:19 IST

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत.

रोहिदास पाटील अनगाव : ‘भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी’ असे वृत्त मंगळवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव यांनी घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत पाणीटंचाईसह दुरवस्था झालेल्या बंधाºयाची पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. नदी कोरडी पडलेली असताना पाणीचोरी सुरूच आहे. याबाबत ग्रामपंचायतीने टँकरमालकांना नोटिसा बजावल्या असल्याचेही जाधव यांनी सांगितले. डाइंग कंपनीला टँकरमधून पाणीपुरवठा होतो.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल आमदार शांताराम मोरे यांनी घेतली. त्यांनी ग्रामसेवक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरही पाणीटंचाई दूर झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. जेव्हा बंधाºयाचे काम सुरू होते, तेव्हा अधिकाºयांनी उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, येथील अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयाची दुरवस्था झाली. बंधारे वाहून गेल्याने पाणी साठून राहत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी संबंधित अधिकाºयांना अहवाल सादर करण्याची सूचना दिली असून नदीपात्राचे खोदकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शेलार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांची सभा घेऊन पाणीचोरांना नोटिसा बजावल्या.

गाळ काढल्यास उन्हाळ्यात फायदा होईलकामवरी नदीतील गाळ काढल्यास पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नदीच्या पाण्याचा उन्हाळ्यात शेतकºयांना भाजीपाला, जनावरांना, नागरिकांना उपयोग होईल. याकरिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनलाल सोनवणे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

अजूनही टंचाई भेडसावत आहेजून महिना उजाडला, तरी नागरिकांना खड्ड्यांतील दूषित पाणी व हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. अधिकारी सांगतात, पाणीटंचाई दूर झाली, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी दौरा करतील का? अधिकाºयांनी कागदोपत्री दाखवलेल्या पाणीटंचाई दूर झाल्यावर विश्वास ठेवणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.