शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

ठाणे स्थानकात रिंग हायड्रंट्स बसविण्याच्या महापालिकेच्या रेल्वे विभागाला सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:32 IST

प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवरुन दिसून आले आहे.

ठळक मुद्देयापूर्वी देखील घडली होती अशीच घटनामहापालिका पुन्हा करणार पत्रव्यवहार

ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकात कारशेडला उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याने मंगळवारी मध्यरात्री अचानक पेट घेतला आणि तो डबा जळून खाक झाला. मात्र अशा घटना घडू नयेत, किंवा घडल्यास, अग्निशमन पथक येईपर्यंत आग विझवण्यासाठी साधन उपलब्ध व्हावीत, यासाठी ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेला रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ठाणे स्थानकात अशा प्रकारे घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत या नळांचा वापर करून आग विझवता येऊ शकेल असा दावा महापालिकेने केला आहे.                     ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र मांक १ जवळ सायिडंगला उभ्या असलेल्या लोकलच्या एका डब्याने मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली होती. हा प्लॅटफॉर्म रस्त्याच्या अगदी जवळ आहे. बी-केबिन या बाजूने सुद्धा या प्लॅटफॉर्मवर जाता येते. मात्र ऐन गर्दीच्या वेळी असा प्रकार घडल्यास आणि स्थानकातील अन्य प्लॅटफॉर्म वर अशी घटना घडल्यास मोठी आपत्ती उदभवू शकते. त्यामुळे गेल्या जुने मध्ये स्थानकात ज्यावेळी अशी घटना घडली होती, त्याचवेळी आम्ही त्यांना अशा प्रकारे व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली. अग्निशमन विभाग रेल्वे विभागाला पुन्हा या संदर्भात नव्याने सूचना पत्र देणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. स्थानकातील हे नळ, शासनाच्या नियमानुसारच असणार आहेत आणि अनेक स्थानकांमध्ये असे नळ आढळतात. अन्य वेळी, पाणी भरण्यासाठी, किंवा लांब पल्ल्याच्या गाडयांना धुण्यासाठी याचा वापर केला जातो. अशी माहिती सुद्धा महापालिकेतील अधिकाºयांनी दिली.प्रत्येक प्लॅटफॉर्म वर ३० मीटरच्या अंतरावर अशा प्रकारे हायड्रंट्स असायला हवेत. १०० मीटर लांबीचे आग विझवण्याचे पाईप्स असायला हवे, जेणेकरून, रेल्वे विभागाला अशा आपत्तीच्या वेळी या पाण्याचा वापर तत्काळ करता येईल. स्टेशनपर्यंत अग्निशमन दलाचे पाईप्स पोहोचणे तसे कठीण जाऊ शकतात. यामुळे अशी व्यवस्था रेल्वेने केल्यास अनर्थ टाळू शकेल असा दावाही पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाºयाने केला आहे.दरम्यान यापूर्वी ७ जुन २०१७ रोजी ठाण्यातील बी केबिन जवळील प्लॅटफॉर्म वरील उभ्या असलेल्या रेल्वे डब्याने पेट घेतला होता. रेल्वे विभागाला धूर घालवण्यासाठी शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले होते. तर नोव्हेंबर २०१६ मध्ये कल्याण लोकल मधील एका डब्ब्यात पेट घेतला होते. वरील पेंटाग्राफ तुटल्यामुळे, या डब्याने पेट घेतला होता. तब्बल ५० प्रवाशांना येथून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. डब्याला लागलेल्या आगीच दृश्य बघून स्थानकात सुद्धा अनेकांनी पळापळ करायला सुरु वात केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRailway Passengerरेल्वे प्रवासी