शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठाणे स्थानकात रिंग हायड्रंट्स बसविण्याच्या महापालिकेच्या रेल्वे विभागाला सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:32 IST

प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवरुन दिसून आले आहे.

ठळक मुद्देयापूर्वी देखील घडली होती अशीच घटनामहापालिका पुन्हा करणार पत्रव्यवहार

ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकात कारशेडला उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याने मंगळवारी मध्यरात्री अचानक पेट घेतला आणि तो डबा जळून खाक झाला. मात्र अशा घटना घडू नयेत, किंवा घडल्यास, अग्निशमन पथक येईपर्यंत आग विझवण्यासाठी साधन उपलब्ध व्हावीत, यासाठी ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेला रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ठाणे स्थानकात अशा प्रकारे घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत या नळांचा वापर करून आग विझवता येऊ शकेल असा दावा महापालिकेने केला आहे.                     ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र मांक १ जवळ सायिडंगला उभ्या असलेल्या लोकलच्या एका डब्याने मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली होती. हा प्लॅटफॉर्म रस्त्याच्या अगदी जवळ आहे. बी-केबिन या बाजूने सुद्धा या प्लॅटफॉर्मवर जाता येते. मात्र ऐन गर्दीच्या वेळी असा प्रकार घडल्यास आणि स्थानकातील अन्य प्लॅटफॉर्म वर अशी घटना घडल्यास मोठी आपत्ती उदभवू शकते. त्यामुळे गेल्या जुने मध्ये स्थानकात ज्यावेळी अशी घटना घडली होती, त्याचवेळी आम्ही त्यांना अशा प्रकारे व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली. अग्निशमन विभाग रेल्वे विभागाला पुन्हा या संदर्भात नव्याने सूचना पत्र देणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. स्थानकातील हे नळ, शासनाच्या नियमानुसारच असणार आहेत आणि अनेक स्थानकांमध्ये असे नळ आढळतात. अन्य वेळी, पाणी भरण्यासाठी, किंवा लांब पल्ल्याच्या गाडयांना धुण्यासाठी याचा वापर केला जातो. अशी माहिती सुद्धा महापालिकेतील अधिकाºयांनी दिली.प्रत्येक प्लॅटफॉर्म वर ३० मीटरच्या अंतरावर अशा प्रकारे हायड्रंट्स असायला हवेत. १०० मीटर लांबीचे आग विझवण्याचे पाईप्स असायला हवे, जेणेकरून, रेल्वे विभागाला अशा आपत्तीच्या वेळी या पाण्याचा वापर तत्काळ करता येईल. स्टेशनपर्यंत अग्निशमन दलाचे पाईप्स पोहोचणे तसे कठीण जाऊ शकतात. यामुळे अशी व्यवस्था रेल्वेने केल्यास अनर्थ टाळू शकेल असा दावाही पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाºयाने केला आहे.दरम्यान यापूर्वी ७ जुन २०१७ रोजी ठाण्यातील बी केबिन जवळील प्लॅटफॉर्म वरील उभ्या असलेल्या रेल्वे डब्याने पेट घेतला होता. रेल्वे विभागाला धूर घालवण्यासाठी शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले होते. तर नोव्हेंबर २०१६ मध्ये कल्याण लोकल मधील एका डब्ब्यात पेट घेतला होते. वरील पेंटाग्राफ तुटल्यामुळे, या डब्याने पेट घेतला होता. तब्बल ५० प्रवाशांना येथून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. डब्याला लागलेल्या आगीच दृश्य बघून स्थानकात सुद्धा अनेकांनी पळापळ करायला सुरु वात केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRailway Passengerरेल्वे प्रवासी