शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीचा ठामपाला दणका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

ठाणे : कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ठाणे महापालिकेने मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीनंतर धक्कादायक ...

ठाणे : कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ठाणे महापालिकेने मानवी हक्क आयोगाच्या नोटिसीनंतर धक्कादायक खुलासा केला आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ६१ जणांच्या मृत्यूची नोंद केली नव्हती. यासंदर्भात तक्रार आल्यानंतरही नोंद का केली नाही, याबाबत महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने ठामपाला नोटीस पाठवून खुलासा करण्यास सांगितले होते. या नोटिसीनंतर शनिवारी पालिका प्रशासनाने ६१ जणांचे मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाल्याची कबुली दिली आहे.

महापालिकेच्या या खुलाशानंतर आतापर्यंत मृत्यूची ही आकडेवारी का लपविण्यात आली? ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी आयोगाची नोटीस येण्याची वाट का बघावी लागली? तसेच ठाणे महापालिकेकडे दररोज मृतांची नोंद घेतली जात नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ठाण्यात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असल्याने मार्चमध्ये असलेला मृत्यूचा दर हा एप्रिल महिन्यात चौपट झाला आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक कमी म्हणजे ०.३४ मृत्यूचा दर नोंदवला गेला. या महिन्यात केवळ ५० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, एप्रिल महिन्यात केवळ २२ दिवसांमध्ये १४८ ठाणेकरांचा या महामारीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील मृत्युदर हा १.३० वर झेपावला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मृत्यूची टक्केवारीदेखील वाढली आहे. दररोज स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पालिका प्रशासन जाहीर करीत असलेली मृत्यूची आकडेवारी आणि प्रत्यक्षात तीन स्मशानभूमीमध्ये नोंद केलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे .

ठाणे महापालिका हद्दीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येबाबत संभ्रम निर्माण झाल्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करून यासंदर्भात महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीमध्ये ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याचे त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयोगाने ठाणे महापालिकेला यासंदर्भात १९ एप्रिल रोजी नोटीस पाठवून तीन आठवड्यांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शनिवारी पालिकेने आपल्या डॅशबोर्डमध्ये आतापर्यंत नोंद न झालेल्या ६१ जणांचा मृत्यू हा खासगी हॉस्पिटलमध्ये झाला असल्याचे सांगत खासगी हॉस्पिटलकडून प्राप्त झालेल्या ६१ मृत्यूचे पुनर्नयोजन केले असल्याचे पालिका प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले.