शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

संरक्षक भिंत नाही; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 11, 2015 01:02 IST

शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा अवघा एक उड्डाणपूल असून त्यावरून अखंड वाहतूक सुरू असते. पश्चिमेला शास्त्रीनगर भागात तीन शाळा आहेत. त्यांचे शेकडो विद्यार्थी याच

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहराला पूर्व-पश्चिम जोडणारा अवघा एक उड्डाणपूल असून त्यावरून अखंड वाहतूक सुरू असते. पश्चिमेला शास्त्रीनगर भागात तीन शाळा आहेत. त्यांचे शेकडो विद्यार्थी याच हमरस्त्यावरून ये-जा करत असतात. ट्रक, डम्पर यासह केडीएमटी, एनएमएमटी आणि अन्य वाहनांमुळे उड्डाणपुलाच्या उतारावरून येताना एखाद्या वेळेस वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्या ठिकाणी महापालिकेने संरक्षक भिंत बांधलेली नाही. नगरसेवकाने कागदी घोडे नाचवले, परंतु त्यास महापालिकेने प्रतिसाद दिलेला नाही. याच ठिकाणाहून वाशी/बेलापूर व अन्य ठिकाणी एनएमएमटीच्या तसेच केडीएमटीच्या बसेस जातात. हजारो प्रवासी त्याचा लाभ घेतात. मात्र, त्यांना उभे राहण्यासाठी चांगला बसथांबा नसल्याने प्रवाशांची आबाळ होते. परंतु, वॉर्डात केडीएमटी-परिवहन सेवा मात्र नागरिकांना मिळू शकलेली नाही. कचराकुंडीमुक्त वॉर्ड शक्य झाला नाही. त्यामुळे घंटागाडी येऊनही कचऱ्याची समस्या आहेच. परिसरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढलेली असून त्यामुळेही नागरिक-वाहनचालक भयभीत आहेत. रात्री-अपरात्री एकटी व्यक्ती आढळल्यास अथवा वाहन जोराने नेल्यास कुत्री मागे लागतात. काही वेळेस चावाही घेतात. अशा स्थितीमुळे नागरिक त्रस्त आहेत. रेल्वे स्थानकालगतच हा परिसर येत असल्याने या ठिकाणी फेरीवाल्यांची समस्या जटील असून त्यावर नियंत्रण मिळवताना नगरसेवकाच्या नाकीनऊ आले आहे. ४-५ धोकादायक इमारती असून तेथे मालक-भाडेकरू यांच्यात समन्वयाचा अभाव असून नगरसेवक त्यात मध्यस्थी करू न शकल्याने समस्या जैसे थे आहे.याच परिसरात शास्त्रीनगर रुग्णालय आहे. ठिकठिकाणांहून पेशंट्स येत असल्याने त्यांनाही सुविधा मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जातच नाहीत. काही ठिकाणची गटारे अद्यापही उघडी आहेत. या ठिकाणी पाण्याची, ड्रेनेजची समस्या सोडवली. ब्रीजच्या ठिकाणी संरक्षक भिंतीसंदर्भात एच वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले, त्यांनी काही केलेले नाही. यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ता या ठिकाणी झाला. भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. वाशी बसथांबा सुधारावा, यासाठी आधी माजी मंत्री गणेश नाईक यांनी निधी दिला होता. आता परिवहन सभापतींना साकडे घातले आहे. - रणजित जोशी, नगरसेवक