शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जीएसटी नव्हे, हा तर ‘बीजेपी टॅक्स’- चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:18 IST

लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी लोकांकडून राज्य चालविणे अपेक्षित असते. पण सध्या लोकशाही पाहायला मिळते का? खाण्यापासून जगण्यावर अनेक बंधने लादली जात आहेत. त्याला लोकशाही म्हणायचे का?

ठाणे : लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी लोकांकडून राज्य चालविणे अपेक्षित असते. पण सध्या लोकशाही पाहायला मिळते का? खाण्यापासून जगण्यावर अनेक बंधने लादली जात आहेत. त्याला लोकशाही म्हणायचे का? जीएसटी या करप्रणालीची मूळ कल्पना काँग्रेसची होती. तिला आधी भाजपाने तीव्र विरोध केला. पण आता तो ज्या अवस्थेत अंमलात आणला गेला, तो जीएसटी नव्हे तर गब्बरसिंग आणि बीजेपी टॅक्स असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी ठाण्यात केली.प्रदेश काँग्रेस समितीने डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील सभागृहात ‘डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स, स्टॅगनन्ट इकॉनॉमी’ या विषयावर परिषद घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि खासदार कुमार केतकर यांनीही विचार मांडले.चिदंबरम म्हणाले, केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना २००६ मध्ये काँग्रेसने जीएसटी करप्रणाली आणण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, भाजपाने सतत आठ वर्षे त्यास तीव्र विरोध केला. त्या करप्रणालीमध्ये रिफंड मिळणार होता. पण भाजपाच्या जीएसटीमध्ये रिफंड मिळण्याची काहीच योजना नाही. व्हॅट, प्राप्तिकर, अबकारी कर या सर्व कर प्रणालीत रिफंड दिला जातो. पण जीएसटीत असे काहीच नाही. जीएसटी -१, जीएसटी -२ आणि जीएसटी -३ अशा तीन प्रकारांमध्ये हा टॅक्स होता. जून २०१८ उजाडला तरी उर्वरित दोन जीएसटींची काहीच अंमलबजावणी झालेली नाही. त्यातील ३-ब हे कलम तर पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला.विकासदरही ८.५ वरुन ६.३ वर आला आहे. नोटाबंदीने अनेक लघुउद्योग देशोधडीला लागले. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेत केवळ ०.२ टक्के इतक्या बनावट नोटा जमा झाल्या. तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडेही दोन हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या, असे चिदंबरम म्हणाले. आगामी काळात बदल होणे अपरिहार्य असून एक महान राष्टÑ घडविण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागलीदेशात १४ हजार शेतकºयांना या व्यवस्थेने आत्महत्या करायला लावली, असा ठपका खा. चव्हाण यांनी ठेवला. सुडाने वागल्याने जनता पक्षाचे सरकार बुडाले, तशीच वेळ मोदी सरकारवर येईल आणि पुढील निवडणुकीत भाजपाला १५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा केतकर यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम