शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नोटाबंदीपूर्वीच ‘सागर’ बुडाली

By admin | Updated: May 14, 2017 22:36 IST

बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर :बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती. तीन ते चार वर्षांपूर्वी व्याजदर कमी करून त्यांनी गुंतवणूकदारांना त्याची हलकीशी कल्पनाही दिली होती. मात्र, जास्त व्याजदराच्या लोभात सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये निर्माण झालेली आर्थिक कोंडी गुंतवणूकदारांच्या लक्षातच आली नाही. केवळ नोटाबंदीचा आधार घेऊन सागर इन्व्हेस्टमेंटने कंपनी बुडाल्याचे जाहीर केले आहे. २८ वर्षांपासून जास्त व्याजदर देणारी आणि शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे फिरवणारी सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी बुडीत निघाली आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकले. गुंतवणूकदारांचेच पैसे अन्य गुंतवणूकदारांचे व्याज देण्यासाठी वापरण्यात येत होते. व्याजदर जास्त मिळत असल्याने सर्वसामान्यांनीही दोन लाखांपासून २० लाखांपर्यंतची गुंतवणूक केली होती. त्यात शहरातील काही बड्या उद्योजकांनीही जास्त व्याजासाठी २५ लाखांपासून ते १ कोटीपर्यंतची गुंतवणूक केली होती. २८ वर्षे न चुकता व्याज मिळत असल्याने सागर इन्व्हेस्टमेंटच्या अनेक शाखा पुणे, ठाणे, डोंबिवली येथे सुरू झाल्या. आलेलीच रक्कम व्याजाच्या स्वरूपात फिरवण्याचा हा व्यवसाय कुठेतरी अडचणीत येणार, याची कल्पना सागर इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख श्रीराम समुद्र, अनघा समुद्र, भक्ती समुद्र, सुहास समुद्र आणि सुनरता समुद्र यांना होती. मात्र, जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवण्याचा निर्णय समुद्र कुटुंबीयांनी घेतला होता. अखेर, या साखळीचा शेवट नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात झाला. नोटाबंदीमुळे कोट्यवधी रुपये वाया गेल्यानेच कंपनीला उतरती कळा लागली, अशी अफवा शहरात पसरवण्यात आली. मात्र, ही कंपनी नोटाबंदीनिमित्ताने बुडाली, हे दर्शवण्याचा प्रयत्न समुद्र कुटुंबीयांनी केला. नोटाबंदीच्या काळात सागर इन्व्हेस्टमेंटकडे कोट्यवधी रुपये पडून होते, असा अंदाज जरी काढला तरी त्याचे संचालक ही रक्कम आपल्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात वाटून जुन्या नोटा बाहेर काढू शकत होते. गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात आलेली रक्कम गुंतवणूकदार आपल्या जबाबदारीवर बँकेत भरणेही शक्य होते. मात्र, नोटाबंदीच्या काळातही सागर इन्व्हेस्टमेंटकडे जुन्या नोटा नव्हत्या, हे उघड होते.